शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

लालू प्रसादांचा काँग्रेसला धक्का; म्हणाले, "इंडिया आघाडीचे नेतृत्व ममतांकडे द्यावं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 10:52 IST

राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी इंडिया आघाडीचे नेतृत्वाबद्दल मोठं विधान केलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लालू प्रसाद यादवांनी पाठिंबा दिला आहे. 

India Alliance Update: हरयाणा पाठोपाठ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसचे पानिपत झाले. त्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीत आता चलबिचल सुरू झाली आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदाराने ममता बॅनर्जींकडे नेतृत्व देण्याची मागणी केली. ममता बॅनर्जी यांनीही यासाठी तयारी दर्शवली. त्यात आता लालू प्रसाद यादव यांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला आहे. लालू प्रसाद यादव यांचं विधान काँग्रेससाठी धक्का असल्याचे म्हटले जात आहे. 

इंडिया आघाडीच्या नेतृत्वाबद्दल आता प्रश्न उपस्थित होत आहे. लोकसभा निवडणुकीपासून इंडिया आघाडीत ताळमेळ नसल्याचे दिसत आहे. हरयाणात काँग्रेसने मित्रपक्षांना दूर ठेवले. तर महाराष्ट्रातही जबर झटका बसला. त्यामुळे आता नेतृत्व बदलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 

लालू प्रसाद यादव काय म्हणाले?

"पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना इंडिया आघाडीच्या नेत्या म्हणून निवडले पाहिजे. काँग्रेसच्या विरोधाला अर्थ नाही. ममतांनाच नेता बनवलं गेलं पाहिजे", असे लालू प्रसाद यादव म्हणाले. बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राजद सत्तेत येणार, असा दावाही त्यांनी यावेळी केला. 

तेजस्वी यादवही सकारात्मक 

ममता बॅनर्जी यांच्याकडे इंडिया आघाडीचे नेतृत्व देण्याबद्दल राजदचे नेते आणि बिहारमधील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी यापूर्वी म्हटलेले आहे की, "तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासह इंडिया आघाडीच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याकडे नेतृत्व देण्याबद्दल आक्षेप नाही. पण, हा निर्णय सर्वांच्या सहमतीने व्हावा."

नेतृत्व करण्यास ममता बॅनर्जी तयार

काही दिवसांपूर्वीच ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीचे नेतृत्व करण्यास तयार आहे असे म्हटले आहे. 

ममता बॅनर्जींनी हरयाणा, महाराष्ट्रातील निकालाबद्दल नाराजी व्यक्त करत म्हटले होते की, "मी इंडिया आघाडीची स्थापना केली होती. आता आघाडीचे नेतृत्व करणाऱ्यांवर ती नीट चालवण्याची जबाबदारी आहे. ते चालवत नसतील, तर त्याला मी काय करू शकते. मी इतकंच म्हणेन की सगळ्यांना सोबत घेऊन चालावं लागेल."

पुढे ममता बॅनर्जी म्हणालेल्या की, "जर मला संधी दिली तर मी इंडिया आघाडी नीट कशी काम करेल, हे निश्चित करेल. मला बंगालबाहेर जायची इच्छा नाहीये, पण मी इथूनच नेतृत्व करू शकते", असेही त्या म्हणालेल्या आहेत. 

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवMamata Banerjeeममता बॅनर्जीcongressकाँग्रेसtmcठाणे महापालिका