शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

लालूंचे मोदींना चॅलेंज, तर बरखास्त करून दाखवा लोकसभा

By admin | Published: May 15, 2017 1:37 PM

भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा बरखास्त करून मध्यावधी निवडणुका घेऊन दाखवाव्यात, असं आव्हान लालूप्रसाद यादव यांनी मोदींना दिलं आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 15 - भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा बरखास्त करून इतरा राज्यांसोबत निवडणुका घेऊन दाखवाव्यात, असं आव्हान लालूप्रसाद यादव यांनी मोदींना दिलं आहे. मोदींनी लोकप्रियतेची चाचपणी करण्यासाठी विविध राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसोबत लोकसभेचीही निवडणूक घ्यावी, असे राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव म्हणाले आहेत.राजकीय अस्थिरता संपवण्यासाठी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्रितरीत्या घ्याव्यात, नीती आयोगाच्या सूचनेचेही लालूप्रसाद यादव यांनी समर्थन केलं आहे. लालूप्रसाद यादव म्हणाले, सरकारला तीन वर्षे झाली आहेत. आता लवकरच सहा राज्यांचा विधानसभा निवडणुका होणार आहेत. या वर्षभरात गुजरात, नागालँड, कर्नाटका, मेघालय, हिमाचल प्रदेश आणि त्रिपुरा राज्यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. मोदी सरकारमध्ये हिंमत असल्यास त्यांनी लोकसभा बरखास्त करून ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, त्या राज्यांसोबतच लोकसभेची निवडणूक घ्यावी, त्यावेळी तुम्हाला तुमच्या लोकप्रियतेची जाणीव होईल, अशी टीकाही लालूंनी मोदींवर केली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींनाच लक्ष्य केलं आहे.लालूप्रसाद यादव म्हणाले, नीती आयोगाने विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याचा पर्याय सुचवला आहे. नीती आयोगाला संघराज्यीय पद्धत आणि प्रादेशिक पक्षांना संपवायचे असल्यानंच असे पर्याय सुचवले जात आहेत. नीती आयोगाच्या माध्यमातून भाजपाचा घटनेत बदल करण्याचा डाव असल्याचाही आरोप लालूंनी केला आहे. देश मोदींच्या हाती सुरक्षित नाही. मोदींना देशाचे तुकडे करायचे आहेत. यांनी देशांतर्गत अस्थिरता निर्माण केली असून, भाजपाचे सरकार हे घाबरट आहे. ते फक्त सत्तेसाठी लाचार आहेत, असंही लालू म्हणाले आहेत. मोदींच्या सत्ताकाळातच आमच्या अनेक जवानांचे खुलेआम शिर कापले गेले. याला जबाबदार कोण, असा प्रश्नही लालूप्रसाद यादवांनी उपस्थित केला आहे. काँग्रेस (यूपीए) सरकार केंद्रात होते. त्यावेळी जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यात आला नाही. पण आता तिथे पाकिस्तानचा झेंडा फडकवला जातोय, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आम्ही सत्तेवर असताना काश्मीरमधील मतदानाचा टक्काही चांगला होता. आज तो घसरला असून अवघे सात टक्के मतदान नोंदवले गेले आहे. संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरूला जम्मू-काश्मीर विधानसभेत पीडीपीने हुतात्म्याचा दर्जा दिला होता. आज त्याच पक्षाच्या सोबतीनं भाजपाने सरकार स्थापन केल्याची टीकाही मोदींनी केली आहे.