शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

भूसंपादन विधेयकावर अखेर सरकारचे नमते

By admin | Published: August 04, 2015 11:45 PM

वादग्रस्त भूसंपादन विधेयकावर तीनवेळा वटहुकूम जारी करीत हा मुद्दा प्रतिष्ठेचा बनविणाऱ्या सरकारने अखेर नमते घेणार असल्याचे संकेत मंगळवारी दिले.

 

अनेक आक्षेप घेतले गेल्यानंतरही हे विधेयक रेटण्याचा प्रयत्न करणा:या सरकारला अखेर नमते घ्यावे लागण्याचे स्पष्ट संकेत मंगळवारी मिळाले. या विधेयकाची चिकित्सा करीत असलेल्या संसदीय समितीच्या शिफारशी स्वीकारण्याची सरकारने तयारी दाखविल्यानंतरही हे नरमाईचे धोरण नाही, असा पवित्र ग्रामीण विकास मंत्री वीरेंद्रसिंग यांनी घेतला आहे.

काँग्रेस आणि डाव्यांखेरीज वादग्रस्त भूसंपादन विधेयकावर तीनवेळा वटहुकूम जारी करीत हा मुद्दा प्रतिष्ठेचा बनविणाऱ्या सरकारने अखेर नमते घेणार असल्याचे संकेत मंगळवारी दिले. या विधेयकाचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या संसदीय समितीच्या शिफारशी स्वीकारण्याचीही सरकारने तयारी दर्शविली. मात्र, त्याचबरोबर याचा अर्थ सरकारने नरमाईचे धोरण अवलंबले असा होत नाही, आम्ही नेहमीच सहमतीवर भर दिला आहे, असा खुलासा ग्रामीण विकासमंत्री वीरेंद्रसिंग यांनी केला आहे.कोणतीही संस्था, राजकीय नेते, पक्ष किंवा शेतकऱ्यांकडून येणाऱ्या चांगल्या सूचनांवर आमचा कोणताही आक्षेप नसेल असे आम्ही प्रारंभापासून सांगत आलो आहे. सहमतीच्या मुद्यांवर विचार व्हायलाच हवा. शेवटी संयुक्त संसदीय समिती ही मिनी संसदच असते. काही लोकांचा आक्षेप किंवा नाराजी असेल तर आम्ही त्या सूचनांचा अभ्यास करू, असे त्यांनी येथे एका पत्रपरिषदेत स्पष्ट केले. संयुक्त समितीच्या अहवालावरच आमची भूमिका अवलंबून राहणार असून ७ आॅगस्टनंतर ते स्पष्ट होईल. समितीच्या अहवालावर सहमती आहे किंवा नाराजी आहे ते समितीच्या अहवालातच कळेल. स्वपक्षीयांनी सुचविल्या सुधारणा संपुआने आणलेल्या कायद्यातील जमिनी ताब्यात घेताना शेतकऱ्यांची परवानगी अनिवार्य करणारे परिशिष्ट कायम ठेवण्याची महत्त्वपूर्ण सुधारणा एस. एस. अहलुवालिया यांच्या नेतृत्वातील संयुक्त संसदीय समितीने स्वीकारली आहे. सरकारला नमते घेत भूमिकेत बदल करावा लागण्याचे कारण भाजपच्याच ११ खासदारांनी सुचविलेल्या दुरुस्त्या हेच आहे. संपुआने आणलेल्या कायद्यात शेतकऱ्यांची परवानगी आणि सामाजिक परिणामांचा आढावा घेणे बंधनकारक केले होते. मोदी सरकारने गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये या कायद्यात बदल करताना या दोन्ही महत्त्वपूर्ण तरतुदी वगळत वटहुकूम जारी केला होता. ही लोकशाहीची थट्टाच- येचुरी मोदी सरकारने भूसंपादन विधेयकातील सुधारणा मागे घेण्याचा निर्णय घेणे ही संसदीय लोकशाहीची थट्टाच आहे. सरकारने तीन वटहुकूम आणण्याची गरज काय? असा सवाल माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)