शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
2
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
3
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
4
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
5
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
6
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
7
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
8
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
9
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
11
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
12
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
13
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
14
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
15
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
16
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
17
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
18
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
19
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...

भूसंपादन विधेयकावर चौथ्यांदा वटहुकूम ?

By admin | Published: August 26, 2015 3:45 AM

भूसंपादन विधेयकावर चौथ्यांदा वटहुकूम आणण्याचा विक्रम मोदी सरकारच्या नावावर जमा होण्याचे संकेत मिळाले आहेत. ३१ आॅगस्टपूर्वी संसदेत विधेयक संमत होण्याची

नवी दिल्ली : भूसंपादन विधेयकावर चौथ्यांदा वटहुकूम आणण्याचा विक्रम मोदी सरकारच्या नावावर जमा होण्याचे संकेत मिळाले आहेत. ३१ आॅगस्टपूर्वी संसदेत विधेयक संमत होण्याची शक्यता नसल्यामुळे सातत्य राखण्यासाठी सरकारकडे वटहुकमाचाच पर्याय उरेल.जुन्या कायद्यात नोकऱ्या देण्याची तरतूद नव्हती. सर्व बाबी विचारात घेऊन हा कायदा आणण्यात आला आहे, असे संसदीय कार्यमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी पत्रकारांना सांगितले. २०१३ मध्ये भूसंपादन कायदा मंजूर झाला तेव्हा भूसंपादनासंबंधी १३ कायदे त्याच्या कक्षेत आणण्यात आले नव्हते. वर्षभरात अन्य कायदे त्यात समाविष्ट करण्याची अट होती. मोदी सरकारने नव्या कायद्यासंबंधी वटहुकूम जारी करताना १३ कायदे त्यात समाविष्ट केले. ३१ आॅगस्ट रोजी वटहुकूम मोडीत निघाल्यास भूसंपादन करताना नवा कायदा लागू करता येणार नाही. त्यात हा कायदा कायम राखण्यासाठीच यापूर्वी तीनदा वटहुकूम जारी करण्यात आला.काही तरतुदींवर मतभेद कायमभाजपचे खासदार एस.एस. अहलुवालिया यांच्या नेतृत्वातील संयुक्त संसदीय समितीने (जेपीसी) शेतकऱ्यांची परवानगी अनिवार्य करणे, सामाजिक परिणामांचा आढावा घेण्यासारख्या महत्त्वपूर्ण तरतुदींवर सहमती घडवून आणली असली तरी काही मुद्यांवर मतभेद कायम आहेत. या समितीने संसदेच्या हिवाळी अधिवेशनात अहवाल सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारला या आठवड्यात वटहुकमाबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे. (वृत्तसंस्था)