शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

अयोध्येत कोट्यवधींचा जमीन घोटाळा, विकासाच्या नावाखाली हेराफेरी;अखिलेश यादव यांचा भाजपवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 16:27 IST

अयोध्येत मोठा जमीन घोटाळा झाल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे.

अयोध्येतील जमिनी प्रकरणी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भाजपावर मोठा आरोप केला आहे. बाहेरच्या लोकांनी अयोध्येत येऊन मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी केली असून हे सर्व नफा कमावण्यासाठी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याचा फायदा स्थानिकांना झालेला नाही.  यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अयोध्या लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराचा पराभव झाला. या मतदारसंघात समाजवादी पक्षाने ती जिंकली, यानंतर आता अखिलेश यादवअयोध्या मतदारसंघात लक्ष दिले आहे.

"पेगाससद्वारे माझा फोन हॅक झाला...", मेहबूबा मुफ्तींच्या मुलीचा भाजपवर गंभीर आरोप

अखिलेश यादव म्हणाले, 'जसे अयोध्येतील जमिनीचे व्यवहार उघड होत आहेत, तसं सत्य समोर येत आहे की, भाजपच्या राजवटीत अयोध्येबाहेरील लोकांना नफा कमावण्यासाठी जमीन खरेदी करण्यात आली आहे. आणि मोठ्या प्रमाणावर विकली जात आहेत. भाजप सरकारने गेल्या ७ वर्षांपासून सर्कल रेट न वाढवणे हे स्थानिक लोकांविरुद्धचे आर्थिक षडयंत्र आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे जमीन घोटाळे झाले आहेत. येथे जमीन भूमाफियांनी विकत घेतली आहे.

अखिलेश यादव म्हणाले, 'अयोध्या-फैजाबाद आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना या सगळ्याचा काहीच फायदा झाला नाही. गरीब आणि शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावाने जमिनी घेणे हा एक प्रकारचा जमीन बळकावणे आहे. अयोध्येत तथाकथित विकासाच्या नावाखाली झालेल्या हेराफेरी आणि जमिनीच्या व्यवहारांची सखोल चौकशी व्हावी ही आमची मागणी आहे, असंही यादव म्हणाले. 

अयोध्येतील जमिनीच्या किंमती झपाट्याने वाढल्या 

अयोध्येत राम मंदिरामुळे, मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक-खाजगी विकास पॅकेजमुळे जमिनीचे प्राइम रिअल इस्टेटमध्ये रूपांतर झाले आहे. अयोध्येतील जमिनीच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. नोव्हेंबर २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापासून मार्च २०२४ पर्यंत जमीन रजिस्ट्रीची चौकशी करण्यात आली आहे. यामुळे अयोध्या आणि आसपासच्या गोंडा आणि बस्ती जिल्ह्यांतील किमान २५ गावांमध्ये जमिनीच्या व्यवहारांची संख्या ३० टक्क्यांपर्यंत वाढल्याचे समोर आले आहे. या जमिनी मंदिराच्या १५ किलोमीटरच्या परिघात येतात. 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवBJPभाजपाAyodhyaअयोध्या