शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मोदी सरकारचे अखेरचे बजेट अंतरिम असणार की लोकप्रिय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 06:28 IST

परंपरा मोडीत काढणार : अनेक सवलतींची घोषणा होण्याची चर्चा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सध्याच्या केंद्रातील सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. लोकसभा निवडणुकीआधी सादर होणारा हा अर्थसंकल्प आधीच्या परंपरेप्रमाणे अंतरिम असेल की लोकप्रिय, असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाला आहे.

या सरकारचे शेवटचे काही महिने राहिले आहेत. स्थापित परंपरेनुसार अशा अंतरिम अर्थसंकल्पात सरकार फार मोठ्या घोषणा करीत नाही. या अर्थसंकल्पात चालू वित्त वर्षाच्या उरलेल्या काही महिन्यांच्या खर्चालाच संसदेची मंजुरी घेते. पूर्ण अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी नव्या सरकारवर सोडली जाते. नियमानुसार, कोणत्याही चर्चेविना मांडण्यात आलेल्या या खर्चाच्या आराखड्यास लोकसभेत मंजुरी घेता येते.

गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकांत भाजपाने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ ही तीन मोठी राज्ये गमावली आहेत. निवडणुका तोंडावर असताना भाजपाला मोठ्या नामुश्कीला सामोरे जावे लागले. त्यामुळे लोकांना खूश करण्यासाठी हे सरकार परंपरा मोडीत काढून लोकप्रिय घोषणा करू शकते, असे जाणकारांना वाटते. विशेषत: मध्यमवर्गाला आकर्षित करण्यासाठी प्राप्तिकर सवलत वाढविण्याचा निर्णय सरकारकडून घेतला जाऊ शकतो, असा अंदाज आहे. (वृत्तसंस्था)अलीकडील इतिहासात निवडणूक वर्षात काय घडले?

  • २०१४-१५ मध्ये तत्कालीन वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांनी अशाच पद्धतीने निवडणूकपूर्व अर्थसंकल्प सादर केला होता. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी खर्च वाढीची तरतूद करण्याचा मोह टाळून त्यांनी तुटीची उद्दिष्टे कायम ठेवली होती.
  • २००९-१० च्या निवडणूकपूर्व अर्थसंकल्पात तत्कालीन वित्तमंत्री प्रणव मुखर्जी यांनी मोठ्या घोषणा टाळल्या. त्या वर्षात सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. पण ंअर्थसंकल्पाच्या फार आधीच या योजनेची अंमलबजावणी झाली होती.
  • वित्तवर्ष २००४-०५ मध्ये तत्कालीन वित्तमंत्री जसवंतसिंग यांनी त्या वेळच्या काही योजनांचा विस्तार करून लाभार्थ्यांची संख्या वाढविली होती. मात्र, नवीन करसवलती जाहीर करण्याचे त्यांनीही टाळलेच होते.
टॅग्स :Budgetअर्थसंकल्प