शहरं
Join us  
Trending Stories
1
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
2
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
3
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
4
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
5
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
6
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
7
Bigg Boss Marathi 5 : सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता? 'त्या' पोस्टने खळबळ
8
Bigg Boss Marathi Season 5: रितेश देशमुखला मिळाल्या भाईजानकडून शुभेच्छा, म्हणाला, "सगळ्यांना वेड लावलं..."
9
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
10
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
11
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
12
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
13
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
14
Bigg Boss Marathi 5 : अंकिता वालावलकर टॉप ३ मध्ये नाही? फिनालेआधीच मोठी अपडेट समोर, चाहते भडकले
15
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
16
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
17
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
18
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
19
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
20
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं

तो फोन शेवटचा! मुलांना मन लावून अभ्यास करण्याचा सल्ला अन्...; काळजात चर्र करणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 12:35 PM

अंगद गुप्ता यांचं मंगळवारी कुटुंबीयांशी शेवटचं संभाषण झालं आणि या संभाषणात त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल आपुलकीने चौकशी केली.

कुवेतमधील मंगाफ शहरात लागलेल्या आगीत ४९ जणांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यांपैकी ४५ भारतीय वंशाचे होते. मृतांमध्ये सर्वाधिक २४ जण केरळचे, पाच तामिळनाडूचे, तीन उत्तर प्रदेश, एक झारखंड आणि दोन जण बिहारचे आहेत. उत्तर प्रदेशातील तीन जणांचा मृत्यू झाला असून त्यात गोरखपूरमधील दोन जणांचा समावेश आहे. एक गुलारियाचा जयराम गुप्ता आणि दुसरा गोरखनाथ पोलीस स्टेशन हद्दीतील जैतपूर उत्तरेतील रहिवासी अंगद गुप्ता. 

गोरखनाथ पोलीस स्टेशन हद्दीतील जटेपूर उत्तर येथील रहिवासी अंगद गुप्ता हे ९ वर्षांपूर्वी कुवेतला गेले होते आणि तेथील एका खासगी कंपनीत कॅशियर म्हणून कामाला होते. मंगफ शहरात गुरुवारी लागलेल्या आगीत त्यांचा मृत्यू झाला. गुरुवारी दूतावासातून आलेल्या फोनवरून हा प्रकार समोर आला आणि तेव्हापासून कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले आहेत.

"मन लावून अभ्यास करा..."

अंगद गुप्ता यांचं मंगळवारी कुटुंबीयांशी शेवटचं संभाषण झालं आणि या संभाषणात त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल आपुलकीने चौकशी केली. मुलांना त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं, मन लावून अभ्यास करा असा सल्लाही दिला. सध्या या घटनेची माहिती मिळताच योगी आदित्यनाथ यांनी परराष्ट्र मंत्रालय आणि कुवेतमधील भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात राहण्याचे निर्देश राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. .

दरम्यान, या घटनेमुळे कुटुंबासह परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. अंगद यांचे धाकटे भाऊ पंकज गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठा भाऊ कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य होता. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झालं आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह यापुढे कसा करणार हा प्रश्न पडला आहे. 

मुलीला नोकरी व आर्थिक मदत देण्याची मागणी 

कुटुंबीयांनी राज्य व केंद्र सरकारकडे मृतदेह सुखरूप परत आणावा तसेच कुटुंबातील मोठी मुलगी अंशिका हिला नोकरी व आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. मृत अंगद गुप्ता यांच्या कुटुंबात पत्नी रीता देवी यांच्यासह मोठी मुलगी अंशिका गुप्ता, मुलगा आशुतोष गुप्ता आणि धाकटा मुलगा सुमित गुप्ता यांचा समावेश आहे.

मृतदेह पोहोचले भारतात 

कुवेतच्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या ४५ भारतीयांचे मृतदेह घेऊन भारतीय हवाई दलाचे (IAF) विमान केरळमधील कोची विमानतळावर उतरलं आहे. कुवेतमधील मंगाफ शहरातील एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत एकूण ४५ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. भारतीय वायुसेनेचे C-130J सुपर हर्क्युलस विमान कोची येथे उतरलेल्या भारतीयांचे मृतदेह परत आणण्यासाठी रवाना करण्यात आले. मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले आहेत. 

टॅग्स :fireआगUttar Pradeshउत्तर प्रदेश