शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

तो फोन शेवटचा! मुलांना मन लावून अभ्यास करण्याचा सल्ला अन्...; काळजात चर्र करणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 12:37 IST

अंगद गुप्ता यांचं मंगळवारी कुटुंबीयांशी शेवटचं संभाषण झालं आणि या संभाषणात त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल आपुलकीने चौकशी केली.

कुवेतमधील मंगाफ शहरात लागलेल्या आगीत ४९ जणांचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्यांपैकी ४५ भारतीय वंशाचे होते. मृतांमध्ये सर्वाधिक २४ जण केरळचे, पाच तामिळनाडूचे, तीन उत्तर प्रदेश, एक झारखंड आणि दोन जण बिहारचे आहेत. उत्तर प्रदेशातील तीन जणांचा मृत्यू झाला असून त्यात गोरखपूरमधील दोन जणांचा समावेश आहे. एक गुलारियाचा जयराम गुप्ता आणि दुसरा गोरखनाथ पोलीस स्टेशन हद्दीतील जैतपूर उत्तरेतील रहिवासी अंगद गुप्ता. 

गोरखनाथ पोलीस स्टेशन हद्दीतील जटेपूर उत्तर येथील रहिवासी अंगद गुप्ता हे ९ वर्षांपूर्वी कुवेतला गेले होते आणि तेथील एका खासगी कंपनीत कॅशियर म्हणून कामाला होते. मंगफ शहरात गुरुवारी लागलेल्या आगीत त्यांचा मृत्यू झाला. गुरुवारी दूतावासातून आलेल्या फोनवरून हा प्रकार समोर आला आणि तेव्हापासून कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले आहेत.

"मन लावून अभ्यास करा..."

अंगद गुप्ता यांचं मंगळवारी कुटुंबीयांशी शेवटचं संभाषण झालं आणि या संभाषणात त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल आपुलकीने चौकशी केली. मुलांना त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं, मन लावून अभ्यास करा असा सल्लाही दिला. सध्या या घटनेची माहिती मिळताच योगी आदित्यनाथ यांनी परराष्ट्र मंत्रालय आणि कुवेतमधील भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात राहण्याचे निर्देश राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. .

दरम्यान, या घटनेमुळे कुटुंबासह परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. अंगद यांचे धाकटे भाऊ पंकज गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठा भाऊ कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य होता. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झालं आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह यापुढे कसा करणार हा प्रश्न पडला आहे. 

मुलीला नोकरी व आर्थिक मदत देण्याची मागणी 

कुटुंबीयांनी राज्य व केंद्र सरकारकडे मृतदेह सुखरूप परत आणावा तसेच कुटुंबातील मोठी मुलगी अंशिका हिला नोकरी व आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. मृत अंगद गुप्ता यांच्या कुटुंबात पत्नी रीता देवी यांच्यासह मोठी मुलगी अंशिका गुप्ता, मुलगा आशुतोष गुप्ता आणि धाकटा मुलगा सुमित गुप्ता यांचा समावेश आहे.

मृतदेह पोहोचले भारतात 

कुवेतच्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या ४५ भारतीयांचे मृतदेह घेऊन भारतीय हवाई दलाचे (IAF) विमान केरळमधील कोची विमानतळावर उतरलं आहे. कुवेतमधील मंगाफ शहरातील एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत एकूण ४५ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. भारतीय वायुसेनेचे C-130J सुपर हर्क्युलस विमान कोची येथे उतरलेल्या भारतीयांचे मृतदेह परत आणण्यासाठी रवाना करण्यात आले. मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले आहेत. 

टॅग्स :fireआगUttar Pradeshउत्तर प्रदेश