शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

लग्न उशिरा; तरीही लग्नानंतरच मुलींच्या जीवनमानात बदल! 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 12:09 PM

भारतात महिलांसाठी शिक्षण आणि नोकरीच्या संधींमध्ये वाढ झाली आहे. त्याचा परिणाम त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक स्तरावर दिसून येतो.

नवी दिल्ली :

भारतात महिलांसाठी शिक्षण आणि नोकरीच्या संधींमध्ये वाढ झाली आहे. त्याचा परिणाम त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक स्तरावर दिसून येतो. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘वूमेन अँड मेन इन इंडिया २०२२’ अहवालानुसार, महिलांचे लग्नाचे सरासरी वय वाढले आहे. हे वय २०१७ मध्ये २२.१ होते, ते वाढून २०२० मध्ये २२.७ झाले आहे. असे असूनही, महिलांची स्थिती अजूनही अनेक प्रकरणांमध्ये विवाहित जीवनावर अवलंबून असते. लग्नानंतर नोकरदार महिलांची संख्या कमी होऊ लागते.

 गाव आणि शहरात लग्नाच्या वयात फरक देशातील शहरी आणि ग्रामीण पातळीवर लग्नाच्या वेळी महिलांच्या सरासरी वयात अजूनही तफावत आहे. तीन वर्षांपूर्वी शहरांमध्ये २३.९ आणि गावांमध्ये २२.२ वर्षे वयात महिलांची लग्ने होत होती. जम्मू आणि काश्मीरमध्ये महिलांचे विवाह करण्याचे वय सरासरी २६ वर्षे आहे. तर सर्वांत कमी वयात (२१ वर्षे) पश्चिम बंगाल आणि झारखंड येथे मुलींचे लग्न केले जाते. २०२० मध्ये दिल्लीमध्ये लग्नाचे वय सरासरी २४.४ वर्षे, मध्य प्रदेशमध्ये २१.८ आणि छत्तीसगडमध्ये २१.६ वर्षे होते.

जबाबदारीचे ओझे...कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे विवाहित महिलांचा श्रमशक्तीमध्ये सहभाग मर्यादित आहे. राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण-५ नुसार, देशातील १५-४९ वयोगटातील केवळ ३२% स्त्रिया लग्नानंतर घराबाहेर काम करतात. पुरुषांमध्ये हेच प्रमाण ९८ टक्के इतके आहे.

नोकरी नव्हे, लग्न हे स्थलांतराचे कारण१९८१ ते २०१७ पर्यंत देशात महिला साक्षरतेचे प्रमाण ४०.५ टक्क्यांनी वाढले आहे, तर पुरुषांच्या बाबतीत ही वाढ केवळ २८.३ % होती. असे असूनही, केवळ ०.६ % महिला शिक्षणासाठी इतर शहरांमध्ये जातात, तर पुरुषांच्या बाबतीत हे प्रमाण ४.७% आहे. ‘भारतातील स्थलांतर २०२०-२१’ अहवालानुसार, केवळ ०.७% स्त्रिया नोकरी, चांगल्या संधी, व्यवसाय, कामाच्या ठिकाणी जवळ असणे किंवा बदलीमुळे स्थलांतर करतात, तर ८६.८ टक्के महिला लग्नामुळे स्थलांतरित होतात.

 देशातील विवाहाच्या वेळी महिलांचे सरासरी वय