शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

नेतेही सामान्यांसारखेच; सुप्रीम कोर्टाने सुनावले, विरोधी पक्षांना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2023 9:06 AM

यंत्रणांचा मनमानी वापर विषयावरील याचिकेवर सुनावणीस नकार

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात केंद्रीय तपास एजन्सींचा मनमानीपणे उपयोग करण्यात येत आहे, असा आरोप करत काँग्रेसच्या नेतृत्वात १४ राजकीय पक्षांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, यावर सुनावणी घेण्यास कोर्टाने बुधवारी नकार दिला. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला यांच्या खंडपीठाने या याचिकेवर विचार करण्यास नकार दिला. खंडपीठाने म्हटले की, राजकारणी लोकांना सामान्य नागरिकांच्या तुलनेत अधिक सूट मिळत नाही. नेतेही सामान्य नागरिकांसारखेच आहेत.

या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाची अनास्था लक्षात घेऊन या राजकीय पक्षांकडून हजर असलेले ज्येष्ठ वकील ए. एम. सिंघवी यांनी याचिका मागे घेण्याची परवानगी मागितली. सुरुवातीला, सिंघवी यांनी काही आकडेवारीचा हवाला देऊन म्हटले आहे की, २०१४ ते २०२२ या काळात विरोधी पक्षांच्या नेत्यांना तपास यंत्रणांकडून लक्ष्य करण्यात आले. सीबीआय आणि ईडीच्या प्रकरणात ६०० टक्के वाढ झाली.

१४ पक्षांची याचिका

काँग्रेससह द्रमुक, राजद, बीआरएस, तृणमूल काँग्रेस, आप, राष्ट्रवादी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), झामुमो, जदयू, माकपा, भाकपा, सपा आदी पक्षांनी केंद्र सरकारवर आरोप केले होते.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय