शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
3
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
4
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
5
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
6
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
7
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
8
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
9
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
10
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
11
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
12
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
13
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
14
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
15
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
16
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
17
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
18
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालं; उपपंतप्रधान तावातावाने म्हणाले...
19
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
20
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई

'नेत्यांना निवृत्तीचं वय नसतं, राजकारण म्हणजे सरकारी नोकरी नाही'   

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 12:10 IST

राजकारण आणि सरकारी नोकरी यांची तुलना केली जाऊ शकत नाही, सरकारी कर्मचाऱ्याला ठराविक काळानंतर निवृत्त व्हावं लागतं मात्र राजकीय नेत्यांचे तसं नसतं.

नवी दिल्ली - राजकारण आणि सरकारी नोकरी यांची तुलना केली जाऊ शकत नाही, सरकारी कर्मचाऱ्याला ठराविक काळानंतर निवृत्त व्हावं लागतं मात्र राजकीय नेत्यांचे तसं नसतं असं मत लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी एका मुलाखतीत मांडले आहे. लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर सुमित्रा महाजन यांनी पीटीआयला मुलाखत दिली. या मुलाखतीत सुमित्रा महाजन यांनी भाजपाकडून लोकसभा निवडणुकीचं तिकीट न मिळाल्यावर अप्रत्यक्षरित्या नाराजीही व्यक्त केली. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने पक्षातील ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना तिकीट नाकारल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं होतं. याच दरम्यान सुमित्रा महाजन यांनी हे वक्तव्य केल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. सुमित्रा महाजन या मुलाखतीत म्हणाल्या की, राजकारणाशी तुलना सरकारी नोकरीसोबत केली जाऊ शकत नाही. सरकारी नोकरीमधील निवृत्तीचं वय आधीपासूनच ठरलेलं असतं. मात्र राजकारणात तसं होत नाही. कारण राजकीय नेता थेट जनतेच्या सुख-दुखा:त सहभागी असतो. जनतेची सेवा करताना त्याला वेळेचे बंधन नसतं असं त्यांनी सांगितले. तसचे मोरारजी देसाई हे वयाच्या 81 व्या वर्षी देशाचे पंतप्रधान झाले होते अशी आठवणही त्यांनी करुन दिली. 

द वीक या संकेतस्थळाला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, वयाची 75 वर्ष पूर्ण केलेल्या नेत्यांना लोकसभेचं तिकीट न देण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. मात्र शहा यांच्या मुलाखतीत कुठेही कोणत्या नेत्याचं नाव घेतलं नव्हतं. पण 12 एप्रिल रोजीच सुमित्रा महाजन यांना 76 वर्ष पूर्ण होण्याआधी 5 एप्रिल रोजी सुमित्रा महाजन यांनी स्वत: यंदाची लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. 

दरम्यान गेली 5 वर्ष मी लोकसभेची अध्यक्ष असल्याने भाजपाच्या कोणत्याही बैठकीत उपस्थित राहू शकत नव्हते. त्यामुळे वय झालेल्या नेत्यांना तिकीट न देण्याचा निर्णय भाजपाच्या कोणत्या बैठकीत पारित झाला याची कल्पना मला नाही. मात्र माझं इतकंही वय झालं नाही की मी राजकीय जीवनातून सन्यास घेईन. मी प्रामाणिकपणे भाजपाचं काम करेल असंही सुमित्रा महाजन यांनी सांगितले. 

काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुण्यातील एका विद्यार्थी संवाद कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्यावेळी तेथील एका विद्यार्थ्यांने राजकारणात नेत्यांनी कधी निवृत्त व्हावं असं तुम्हाला वाटतं? असा प्रश्न राहुल यांना विचारला होता. त्यावर राजकारणात निवृत्तीसाठी 60 वर्ष असावं असं माझं वैयक्तिक मतं असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितले होते.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSumitra Mahajanसुमित्रा महाजनAmit Shahअमित शहाBJPभाजपाPoliticsराजकारण