शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
2
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
3
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
4
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
5
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
6
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
7
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
8
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
9
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
10
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
11
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
12
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
13
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
14
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
15
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
16
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
17
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
18
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
19
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
20
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 

सोनिया गांधींचे नेतृत्वच ‘काँग्रेसचे ऐक्य’ राखेल

By admin | Published: May 23, 2016 4:00 AM

सोनिया गांधी यांचे नेतृत्वच काँग्रेसमध्ये ऐक्य राखू शकेल. त्यांच्याशिवाय पक्षात फाटाफूट पडेल, असे मत केंद्रीय मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली : सोनिया गांधी यांचे नेतृत्वच काँग्रेसमध्ये ऐक्य राखू शकेल. त्यांच्याशिवाय पक्षात फाटाफूट पडेल, असे मत केंद्रीय मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड केली जाण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच नायडू यांचे हे विधान आले आहे.एका मुलाखतीत बोलताना नायडू म्हणाले की, नेतृत्व त्यांची अंतर्गत बाब आहे. सोनियांमुळे काँग्रेस एक आहे, एवढेच मी म्हणू शकतो. त्यांचे नेतृत्व नसते तर काँग्रेसची शकले उडाली असती. मला घराणेशाही मान्य नाही, तरीपण हे माझे स्पष्ट मत आहे. लोकशाहीत घराणेशाही ‘धोकादायक’ आहे; पण काँग्रेस आणि काही लोकांसाठी ती ‘चविष्ट’ आहे. सोनिया गांधी यांनीच पक्षात ऐक्य राखले, ही वस्तुस्थिती मान्य करावीच लागेल. चार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश पुडुच्चेरीत झालेल्या विधानसभा निवडणुकीतील निकालाचा उल्लेख करून ते म्हणाले की, हे निकाल पाहता एक नेता म्हणून त्यांचे नेतृत्व यशस्वी झाले नाही. पराभवानंतर सोनिया गांधी यांनी ‘आत्मपरीक्षणा’चे आवाहन केले आहे. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, हा आमच्या चिंतेचा विषय नाही. तो त्यांचा विषय आहे. त्यांना आपली धोरणे व कार्यप्रणाली यावर नव्याने विचार करावा लागेल. कामाची प्रणाली बदलावी लागेल.पक्षात राहुल गांधी यांचे महत्त्व वाढले आहे. त्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना नायडू म्हणाले की, काँग्रेस उपाध्यक्ष पूर्वीपासूनच व्यावहारिकपणे पक्ष चालवत आहेत. याबाबत कोणताही संशय नाही. ते जर पक्षाचे अध्यक्ष झाले तर विरोधी पक्षनेतेही होऊ शकतात. संसदेत त्यांची काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून निवड झाली तर काहीच अडचण नाही. तेच गेल्या १२ वर्षांपासून कामकाज पाहत आहेत, त्यांना काँग्रेस अध्यक्ष करणार असेल तर माझ्या त्यांना शुभेच्छा!