शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मलाही सांगायचय संस्थानकालीन घाटाचा विकास व्हावा

By admin | Published: December 20, 2015 11:59 PM

भोर शहरातील संस्थानकालीन घाटावर केरकचरा घाणीच साम्राज्य पसरले आहे. यामुळे या घाटाची दुरवस्था झाली आहे. यामुळे भोर शहराचे ऐतिहासिक वैभव लोप पावत चालले आहे. या संस्थानकालीन ऐतिहासिक ठेव्याचे जतन करून पर्यटनवाढीच्या दृष्टीने याचा विकास करण्यात यावा. शहरातील सुमारे अडीचशे वर्षांपूर्वीचा संस्थानकालीन घाट अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होता. मात्र, स्वच्छता मोहिमेमुळे या घाटाला ऐतिहासिक वैभव प्राप्त झाले होते. नीरा नदीलगत काशी घाटाप्रमाणेच हा घाट बांधण्यात आला होता आणि घाटावर गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे पूर्वी या घाटाला गणेश घाट म्हणत होते. फडणीस घाट, बावडेकर घाट, जानाई घाट असे अनेक घाट असून घाटावर शनिमंदिर, रामेश्वर मंदिर, मुरलीधर ही मंदिरे आहेत. त्यामुळे भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र, यांची कोणत्याच प्रक

भोर शहरातील संस्थानकालीन घाटावर केरकचरा घाणीच साम्राज्य पसरले आहे. यामुळे या घाटाची दुरवस्था झाली आहे. यामुळे भोर शहराचे ऐतिहासिक वैभव लोप पावत चालले आहे. या संस्थानकालीन ऐतिहासिक ठेव्याचे जतन करून पर्यटनवाढीच्या दृष्टीने याचा विकास करण्यात यावा. शहरातील सुमारे अडीचशे वर्षांपूर्वीचा संस्थानकालीन घाट अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होता. मात्र, स्वच्छता मोहिमेमुळे या घाटाला ऐतिहासिक वैभव प्राप्त झाले होते. नीरा नदीलगत काशी घाटाप्रमाणेच हा घाट बांधण्यात आला होता आणि घाटावर गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे पूर्वी या घाटाला गणेश घाट म्हणत होते. फडणीस घाट, बावडेकर घाट, जानाई घाट असे अनेक घाट असून घाटावर शनिमंदिर, रामेश्वर मंदिर, मुरलीधर ही मंदिरे आहेत. त्यामुळे भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र, यांची कोणत्याच प्रकारची सोय नाही. या घाटावर शहरातील सांडपाणी केरकचरा जाऊन सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे येथे दुर्गंधी पसरली आहे. घाणीमुळे घाटाच्या पायर्‍या गाडल्या गेल्या आहेत. संपूर्ण पाणी दूषित झाले आहे. या ठिकाणी गवतही मोठ्या प्रमाणात उगवले आहे. संरक्षक कठड्यांचा अभाव, वीज व्यवस्था, बसण्याचीही या ठिकाणी सोय नाही.
काही वर्षांपूर्वी शहरातील नागरिकांनी पुढाकार घेऊन स्वच्छता मोहीम राबविल्याने घाटाला गतवैभव प्राप्त झाले होते. मात्र, शहरातील नागरिक व नगरपलिकेच्या दुर्लक्षामुळे पुन्हा घाटाची दुरवस्था झाली आहे. या घाटावर संरक्षक कठडे, विजेची तसेच बसण्याची सोय केल्यास व घाट स्वच्छ करून, नीरा नदीतून वाहणार्‍या पाण्यात नौका विहाराची सुविधा करून पर्यटनदृष्ट्या चालना दिल्यास अनेक नागरिक, आबालवृद्ध याचा फायदा होणार आहे. यामुळे लोकांची सोय होईल तर नगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ होऊ शकेल आणि शहराचा ऐतिहासिक ठेवा असलेल्या संस्थान कालीन घाटाला गतवैभव प्राप्त होणार आहे. मात्र, त्यासाठी पाठपुरावा करून काम करणे गरजेचे आहे, तरच ते शक्य होणार आहे.
ज्ञानेश्वर सावंत-
अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ