शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
3
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
4
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
5
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
6
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
7
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
8
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
9
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
10
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
11
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
12
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
13
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
14
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
15
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
16
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
17
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
18
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
19
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
20
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर

दहशतवादाच्या राक्षसाला नष्ट करू

By admin | Published: July 06, 2017 5:22 AM

दहशतवादाचा दानव रोखण्याचा निर्धार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी बुधवारी

तेल अविव : दहशतवादाचा दानव रोखण्याचा निर्धार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी बुधवारी जारी केलेल्या संयुक्त निवेदनाद्वारे केला आहे. दहशतवादला थारा देणाऱ्या आणि त्यांना आर्थिक सहकार्य करणाऱ्यांविरोधात एकत्र लढणार असल्याची ग्वाहीही दोन्ही नेत्यांनी दिली. इस्रायलच्या ऐतिहासिक दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी मोदी आणि नेत्यानाहू यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संयुक्त निवेदन केले. त्यावेळी मोदी यांनी दहशतवादाची तुलना दानवाशी केली. तसेच या दानवाला रोखण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. दहशतवादाला कोणतेही स्थान असू नये, असे नेतान्याहू यांनी सांगितले. पाकिस्तानचा थेट उल्लेख न करता मोदी म्हणाले की, भारताला दहशतवादी हल्ल्यांचा मोठा सामना करावा लागतो आहे. तशीच स्थिती इस्रायलचीही आहे. त्यामुळे आम्ही एकत्र येऊन दहशतवादाविरोधात, दशतवाद्यांना आर्थिक सहकार्य करणाऱ्यांविरोधात लढण्याचा निर्धार केला आहे. सायबर जगतातून केल्या जाणाऱ्या दहशतवादी कारवायांविरोधातही एकत्रित लढार देणार आहोत. मोदीं हे वक्तव्य एका अर्थाने पाकिस्तानला इशारा मानले जात आहे. मोदी, आय लव्ह यू! मुंबई हल्ल्यात वाचलेल्या चिमुकल्या मोशेने व्यक्त केल्या भावनामुंबई हल्ल्यात सुखरुप बचावलेला चिमुकला मोशे याचीही मोदींनी भेट घेतली. या भेटीने भारावून गेल्यानंतर मोशे म्हणाला, ‘‘पंतप्रधान मोदी आय लव्ह यू... माझं तुमच्यावर आणि भारतीयांवर प्रेम आहे.’’ करारांची सप्तपदीगंगा शुद्धीकरणापासून ते अवकाश संशोधन तंत्रज्ञानापर्यंत करणार साह्यमोदी यांच्या दौऱ्याचे फलित म्हणजे भारत आणि इस्रायल यांच्यात झालेले सात मोठे करार. अंतराळ, कृषी व संरक्षण क्षेत्रांतील सहकायार्बाबत दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहे. गंगा स्वच्छतेसाठीही इस्रायलने भारतासोबत करार केला आहे. मोदींना काय भेट दिलीनेत्यानाहू यांनी मोदी यांना भारतीय सैनिकांचे जुने छायाचित्र भेट म्हणून दिले. जेरूसलेमला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या लढ्यात ब्रिटीश सैनिकांचे नेतृत्व करणाऱ्या भारतीय सैनिक या चित्रात दिसतात. ही आठवण आहे. औद्योगिक तंत्रज्ञानातील संशोधन आणि विकासासाठी 40कोटी डॉलरचा फंड उभारणार. भारतातील उद्योगांना मोठा फायदा होणार.भारताच्या जलसंधारणासाठी करार. यामुळे पाण्याचे प्रश्न, पाणी दुषित होण्याच्या समस्यांवर उपाय काढला जाणार असल्याने कृषी क्षेत्रालाही फायदा होईल.भारतातल्या राज्यांमध्ये पाण्याची गरज भागवण्यासंदर्भात करार. त्यासाठी जलशुद्धीकरणातही मदत मिळणार.कृषी क्षेत्रासाठी विकास सहकार्य अशा २०१८ ते २०२० या तीन वर्षांच्या कार्यक्रमाची घोषणा.