शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

सहा महिन्यांत दहशतवाद नष्ट करू

By admin | Published: October 05, 2016 5:45 AM

पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या तळांची फार मोठी हानी सलग सहा महिने मोहीम राबवून करता येऊ शकेल, असे भारताच्या सशस्त्र दलांनी राजकीय नेतृत्वाला सांगितले आहे.

नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या तळांची फार मोठी हानी सलग सहा महिने मोहीम राबवून करता येऊ शकेल, असे भारताच्या सशस्त्र दलांनी राजकीय नेतृत्वाला सांगितले आहे. लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेली माहिती अशी की, गेल्या आठवड्यात भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले व ३८ दहशतवाद्यांना ठार मारले. हे असे हल्ले अधूनमधून केले तरी त्यामुळे दहशतवाद्यांच्या क्षमतेचे नुकसान होणार नाही तर त्यासाठी मध्यम मुदतीच्या योजनेची गरज आहे, असे राजकीय नेतृत्वाला सांगितले आहे.

सशस्त्र दलांतील वरिष्ठ व्यूहरचनाकारानेही सरकारने काश्मीरमध्ये सर्जिकल आॅपरेशनचे पडसाद उमटतील म्हणून तयार राहावे, असे सांगितले. रविवारी बारामुल्लातील सीमा सुरक्षा दलाच्या छावणीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. देशात इतरत्रही असे हल्ले होऊ शकतात. सर्जिकल आॅपरेशनसारख्या हल्ल्यांसाठी दहशतवाद्यांचे तळही लक्ष्य करणे गरजेचे आहे व त्यासाठी निश्चयाने मोहीम राबवावी लागेल, असे हा अधिकारी म्हणाला.

दहशतवाद्यांचे नेटवर्क आता दोन पावले मागे गेले असले तरी खरोखर काही साध्य करायचे असेल तर मध्यम मुदतीची म्हणजे सहा महिन्यांची मोहीम राबवावी लागेल. एखाद्या हल्ल्याने त्यांना रोखता येणार नाही, असे हा अधिकारी म्हणाला. सर्जिकल आॅपरेशनचा सूड घेण्यास पाकमध्ये असलेल्या व दहशतवाद्यांना हाताळणाऱ्यांकडून येत्या आठवड्यांत आणखी जास्त दहशतवादी घुसविण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असे भारताच्या जनरल्संना वाटते. (लोकमत न्यूज नेटवर्क)