शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

हैदराबादमधील दलित विद्यार्थी रोहीत वेमुलाचं आत्महत्येपूर्वीच पत्र

By admin | Published: January 19, 2016 2:08 PM

रोहीत वेमुला या दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येने हैदराबाद विद्यापीठातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून या विद्यापीठात दलितांना हीन वागणूक मिळत असल्याचे आरोप होत आहेत

ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. १९ - रोहीत वेमुला या दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येने हैदराबाद विद्यापीठातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून या विद्यापीठात दलितांना हीन वागणूक मिळत असल्याचे आरोप होत आहेत. त्याखेरीज अभाविपच्या माध्यमातून भाजपा हिंदुत्ववादी अजेंडा राबवत असल्याचा आणि डाव्या विचारांच्या विद्यार्थ्यांची गळचेपी करत असल्याचे आरोप होत आहेत. रोहीत वेमुलाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेले कथित पत्र टाइम्स ऑफ इंडियाने दिलं असून, त्याचा अनुवाद पुढीलप्रमाणे:
 
सुप्रभात,
 
ज्यावेळी तुम्ही हे पत्र वाचत असाल, त्यावेळी मी तुमच्यासोबत नसेन. माझ्यावर रागाऊ नका. मला माहित्येय तुमच्यापैकी काहीजणांनी माझी खरंच काळजी घेतली. माझी कुणाबाबतही तक्रार नाही. मला माझ्या स्वत:बद्दलच समस्या होत्या. मला वाटतं माझा आत्मा आणि शरीर यांच्यात दरी वाढत होती, आणि मी दैत्य झालो आहे. मला लेखक व्हायचं होतं. विज्ञानाचा लेखक, कार्ल सेजनप्रमाणे. आणि अखेर, मी हे एकच पत्र मी लिहू शकतोय. 
मला विज्ञान, तारे, निसर्ग आवडायचे. तसंच मी लोकांवरही प्रेम करायचो. पण मला कळलं नव्हतं की, लोकांनी केव्हाच निसर्गापासून फारकत घेतलेली आहे. आपलं प्रेम कृत्रिम झालंय. आपल्या श्रद्धांना रंग चढलेत. कृत्रिम कलेद्वारे आपलं सत्यरुप जोखलं जातं. दु:खी न होता, प्रेम करणं हे खूपच कठीण होऊन बसलंय. 
माणसाचं मूल्य हे त्याची ओळख व नजीकची शक्यता इतक्या कालच्या पातळीवर आली आहे. एका मताएवढी, एका आकड्याएवढी किंवा अशाच एका गोष्टीएवढी. माणसाकडे एक मन या दृष्टीने बघितलं गेलंच नाही. प्रत्येक क्षेत्रात, मग ते शिक्षणाचे असो, रस्त्यावर असो, राजकारण असो किंवा अगदी मरण व जगणं असो.
मी या प्रकारचं पत्र पहिल्यांदाच लिहितोय. शेवटच्या पत्राची पहिली वेळ. जर मी तर्क नीट मांडत नसेन तर मला माफ करा.
शक्य आहे की, हे जग संजून घेण्यात मी चूक केली. प्रेम, दु:ख, जीवन व मरण समजण्यात मी कमी पडलो. कसलीही कधी घाई नव्हती. पण मी कायम घाई करत राहिलो. जीवन सुरू करण्यासाठी अत्यंत उतावीळ झालो. काही लोकांसाठी जीवन हाच एक शाप आहे. माझा जन्म हाच एक अपघात आहे. लहानपणाच्या एकाकीपणापासून मी कधीच उभारी घेऊ शकलो नाही. माझ्या भूतकाळातलं दुर्लक्षित पोर.
या क्षणी मी दुखावलो गेलेलो नाही, मी दु:खीही नाही. मी केवळ रीता आहे. स्वत:बद्दल काही घेणंदेणंच नसलेला. हे फारच वाईट आहे आणि त्यामुळेच मी हे पाऊल उचलतोय.
माझी संभावना लोक भित्रा अशी करतिल. मी गेल्यावर कदाचित स्वार्थी किंवा मूर्खही म्हणतील. माझा मरणोत्तर कथांवर, आत्म्यांच्या कथांवर किंवा भूताखेतांवर विश्वासही नाहीये. जर माझा कशावर विश्वास असेल तर यावर आहे की मी ता-यांपर्यंत पोहोचू शकतो आणि दुस-या जगाबद्दल जाणू शकतो. 
जर तुम्ही हे पत्र वाचत असताना माझ्यासाठी काही करू शकत असाल, तर मला सात महिन्यांची फेलोशिप मिळायची बाकी आहे जी, एक लाख ७५ हजार रुपये होते. मी रामजीचं ४० हजार रुपयांच्या आसपास देणं लागतो. त्यांनी ते कधी मागितले नाहीत, परंतु कृपया ते त्यांना द्यावेत.
माझा अंत्यविधी शांततेत व सुरळित व्हावा. असं वागा, जसा की मी आलो आणि गेलो. माझ्यासाठी अश्रू वाहू नका. लक्षात घ्या की जगण्यापेक्षा मला मरणात सुख आहे. 'सावलीपासून ते ता-यांपर्यंत'
उमा अण्णा, या गोष्टीसाठी तुमची खोली वापरल्याबद्दल माफ करा. ASA च्या कुटुंबातील सदस्यांनो, तुम्ही माझ्यावर खूप प्रेम केलंत, परंतु तुम्हाला निराश केल्याबद्दल माफ करा. भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
 
अखेरचा एकदा
 
जय भीम
 
मी उपाचाराचं लिहायला विसरलोच... माझ्या आत्महत्येसाठी कुणीही जबाबदार नाहीये.