शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
2
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
3
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
4
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
5
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
6
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
7
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
8
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
9
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
10
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
11
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
12
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
13
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
14
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
15
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
16
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
17
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
18
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
19
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
20
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

बिहारमध्ये वीज कोसळून 57 लोकांचा मृत्यू

By admin | Published: June 22, 2016 3:47 PM

बिहारमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, वीज पडून आतापर्यंत 57 लोकांचा मृत्यू झाला आहे.

 एस. पी. सिन्हा

पटना, दि. 22- बिहारमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, वीज पडून आतापर्यंत 57 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात 24 जण गंभीर जखमी झाले आहेत. राज्य सरकारनं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, मृतांच्या नातेवाईंकांना 4 लाखांची नुकसानभरपाई दिली आहे. 
पावसानं सामान्यांना जरी दिलासा मिळाला असला तरी अनेकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री चंद्रशेखर यांनी आतापर्यंत 56 ते 57 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती दिली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता चंद्रशेखर यांनी व्यक्त केली आहे. हे मृत्यू 15 वेगवेगळ्या जिल्ह्यात झाले असून, पटना जिल्ह्यात सर्वाधिक 6 लोकांचा मृत्यू झाला आहे. रोहतास आणि बक्सरमध्ये पाच लोक वीज पडून मृत्युमुखी पडले आहेत. 
नालंदा, औरंगाबाद, पूर्णिया, कैमूर, सहरसा, भोजपूर, कटिहार, किशनगंज, पश्चिम चंपारण, गया आणि समस्तीपूर या जिल्ह्यात वीज कोसळून सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. अनेक जखमींची अवस्था बिकट असल्यानं मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आपत्ती व्यवस्थापन मंत्री चंद्रशेखर यांनी व्यक्त केली आहे. सर्व जखमींवर स्थानिक जिल्हा हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत असल्याची माहिती बिहार सरकारकडून देण्यात आली आहे.