शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
2
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
4
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
5
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
6
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
7
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
8
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
9
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
10
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
11
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
12
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
13
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
14
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
15
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
16
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
17
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
18
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
19
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...

एलओसीजवळ पुन्हा दहशतवादी शिबिरांमध्ये वाढ

By admin | Published: May 03, 2017 9:28 AM

भारतीय लष्कराने सप्टेंबर 2016 साली पाकव्याप्त काश्मीर येथे केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर ताबा रेषेलगत पाकिस्तान समर्थक दहशतवादी संघटनांच्या अड्ड्यांचा पुन्हा सुळसुळाट वाढल्याचे वृत्त समोर आले आहे.

 ऑनलाइन  लोकमत

नवी दिल्ली, दि. 3 - भारतीय लष्कराने सप्टेंबर 2016 साली पाकव्याप्त काश्मीर येथे केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर ताबा रेषेलगत पाकिस्तान समर्थक दहशतवादी संघटनांच्या अड्ड्यांचा पुन्हा सुळसुळाट वाढल्याचे वृत्त समोर आले आहे.  जवळपास दहशतवादी संघटनांनी 20 नवीन अड्डे उभारले आहेत, अशी माहिती भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला अगदी खेटून काही अड्डे अस्तित्वात असून, नवीन अड्ड्यांसह दहशतवाद्यांच्या एकूण अड्ड्यांची संख्या 35 ते 55च्या घरात पोहोचली आहे. हे सर्व अड्डे भारतविरोधी दहशतवादी कारवायांत सक्रिय आहेत. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या जवळपास 55 दहशतवादी संघटनांचे प्रशिक्षण शिबिर सुरू आहेत. या शिबिरामध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात असून त्यांना भारतविरोधी कारवाया करण्यासाठी तयार केले जात आहे. पाकिस्तानातील वेगवेगळ्या दहशतवादी संघटना येथे आपले प्रशिक्षण शिबिर चालवत आहेत.  सप्टेंबर 2016 मध्ये भारतीय लष्कराकडून करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर बिथरलेल्या 55 पैकी 35 दहशतवादी शिबिरांनी आपला गाशा गुंडाळत ठिकाणं बदलली होती. पण सध्या या दहशतवादी संघटनांनी आपला मुक्काम पुन्हा आधीच्या ठिकाणी हलवल्याचे वृत्त आहे. 
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्ष 2017च्या सुरुवातीला 4 महिन्यांमध्ये दहशतवाद्यांनी जवळपास 60 वेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. यातील 15 दहशतवाद्यांचा भारतव्याप्त काश्मीरच्या सीमेजवळ घुसखोरी करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. गुप्तचर संस्थाच्या हवाल्याने माहिती देत एका अधिका-याने सांगितले की, काश्मीर खो-यात आताच्या घडीला जवळपास 160 दहशतवादी सक्रीय आहेत. या दहशतवाद्यांच्या पाकिस्तानातील म्होरक्याने त्यांना भारतीय सुरक्षा दलांविरोधात हल्ले वाढवण्याचे निर्देश दिल्याचीही माहिती आहे. दरम्यान, दहशतवाद्यांकडून काश्मीर खो-यातील तरुणांनाही त्यांच्या संघटनांमध्ये सामील करुन घेतले जात आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये काश्मीर खो-यातील जवळपास 100 तरुण दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी झाल्याचे म्हटले जात आहे. 
 
हाती आलेल्या माहितीनुसार, दहशतवादी संघटना सुरक्षा दलांवरील हल्ले वाढवून आपल्या सदस्यांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर सोमवारी जम्मू-काश्मीर बँकेच्या कॅश व्हॅनवर कुलगामजवळ दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन बँक कर्मचारी व पाच पोलीस असे सात जण ठार झाले. दहशतवाद्यांनी 50 लाख रुपये आणि शस्त्रे घेऊन पळ काढला. या हल्ल्याची जबाबदारी हिजबुल मुजाहिद्दीनने स्वीकारली. मात्र नंतर यासाठी हिजबुल मुजाहिद्दीनने सीआरपीएफला दोषी ठरवलं. यामागील कारण म्हणजे सीआरपीएफबाबत स्थानिक नागरिकांच्या मनात द्वेष पसरवून सीआरपीएफला खलनायक बनवणे, हा या दहशतावाद्यांचा उद्देश आहे. जेणेकरुन स्थानिक संतापल्याने ते स्वतः भारतीय जवानांविरोधात निदर्शन करुन आपला रोष व्यक्त करतील. यापूर्वी रविवारी श्रीनगरच्या खानयार पोलीस ठाण्यावर हल्लेखोरांनी ग्रेनेडचा मारा केला. त्यात चार पोलीस जखमी झाले; तर एका नागरिकाचा मृत्यू झाला.
 
दहशतवाद्यांनी पुन्हा लुटली बँक 
तर मंगळवारी (2 मे) कुलगाम जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांनी पुन्हा बँक लुटल्याची घटना मंगळवारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, कुलगाम जिल्ह्यातील कादर येरीपोरा परिसरात असलेल्या इलाकाई देहाती बॅंकेत दोन दहशतवाद्यांनी दरोडा टाकला. या दरोड्यात 65, 000 रुपयांची रोकड लुटून पोबारा केला.