शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

रुग्णसंख्या वाढल्याने देशात पुन्हा लॉकडाउन? या राज्यांनी दिले निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 07:42 IST

तामिळनाडूतील चेन्नई येथे 19 ते 30 जूनपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे गुवाहटी येथेही मंगळवार 23 जूनपासून 14 दिवसांसाठी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.

नवी दिल्ली - कोरोनामुळे देशात तब्बल अडीच महिन्यांचा कडक लॉकडाऊन पाळण्यात आला. त्यानंतर, केंद्र आणि राज्य सरकारने अनलॉक करत परिस्थिती पूर्वपदावर आणण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अनलॉक 1 मध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. सध्या देशातील एकूण रुग्णांची संख्या साधारणपणे 4.5 लाखांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा देशातील अनेक राज्यांवर लॉकडाउनचे सावट घोंगावत असून काही राज्यांनी लॉगडॉउन लागू केले आहे. 

तामिळनाडूतील चेन्नई येथे 19 ते 30 जूनपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे गुवाहटी येथेही मंगळवार 23 जूनपासून 14 दिवसांसाठी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. आता, बंगळुरु येथेही कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, लॉकडाउन लागू करण्यावर विचारविनिमय सुरू आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. त्यात, राजधानी मुंबई अव्वलस्थानावर असून एकट्या मुंबईतील रुग्णांची संख्या 67 हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळे, मुंबईतही पुन्हा लॉकडाउन लागू केला जाण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. 

तामिळनाडूत कोरोनाचा गुणाकार होताना दिसत आहे, त्यात चेन्नई येथे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे, मेट्रोपोलियन सिटी असलेल्या चेन्नईतील जिल्ह्यात  19 ते 30 जूनपर्यंत लॉकडाउन लागू झाला आहे. चेन्नई, कांचीपूरम, चेंगलपट्टू, आणि तीरवल्लर या शहरात हा लॉकडाउन असून यास 'मैक्सिमाइज रेस्ट्रिक्टेड लॉकडाउन' असे नाव देण्यात आले आहे. चेन्नईत कोरोनाचे एकूण 44,205 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 1380 नवीन रुग्णांची भर पडली आहे. 

आसाममध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, पुन्हा एकदा लॉकडाउनची चर्चा सुरु आहे. गुवाहटीच्या 11 नगरपालिका क्षेत्रात मंगळवारपासूनच 14 दिवसांसाठी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. आसाममध्ये आत्तापर्यंत 3718 एकूण रुग्ण आढळले असून त्यापैकी 1584 लोकं बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, खबरदारी म्हणून सरकारकडून लॉकडाउन करण्यात आले आहे. दरम्यान, बंगळुरुतही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री येदीयुरप्पा यांनी, ज्या भागात रुग्णांची वाढ होतेय, तेथे लॉकडाउन कडक करण्याचे निर्देश दिले आहेत. 

दरम्यान, देशातील एकूण रुग्णसंख्या आत्तापर्यंत 4,40,215 वर पोहोचली असून त्यामध्ये 1,78,014 एक्टीव्ह रुग्ण आहेत. तर जवळपास अडीच लाख रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. दरम्यान, कोरोनामुळे देशात 14,011 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTamilnaduतामिळनाडूBengaluruबेंगळूरMumbaiमुंबई