शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

लोकसभेचा 'त्रिशंकू' निकाल लागल्यास 'हे' त्रिकूट ठरवणार सरकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 13:50 IST

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बहुतांश पक्षांनी, आपण कोणत्या गटाचे, हे आधीच जाहीर केलं आहे. याला तीन नेते अपवाद आहेत.

ठळक मुद्दे२७२ ची 'मॅजिक फिगर' कोण गाठणार, याबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.लोकसभा त्रिशंकू झाली, तर पुढचं गणित तीन राज्यांतील ती नेत्यांवर अवलंबून असेल. ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या तीन राज्यांमध्ये लोकसभेच्या ६३ जागा आहेत.

लोकसभा निवडणुकीतील सहाव्या टप्प्याचं मतदान उद्या १२ मे रोजी होतंय. त्यानंतर, १९ मे रोजी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यांत ५९ जागांवर मतदान होईल आणि मग सगळ्यांच्या नजरा खिळतील, त्या २३ मे या तारखेवर. लोकसभेचा महासंग्राम कुणी जिंकला, हे या दिवशी ठरणार आहे. २७२ ची 'मॅजिक फिगर' कोण गाठणार, याबद्दल राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. यावेळी कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असा अंदाज काही जण वर्तवताहेत. तो जर खरा ठरला आणि लोकसभा त्रिशंकू झाली, तर पुढचं गणित तीन राज्यांतील ती नेत्यांवर अवलंबून असेल. हे त्रिकूट 'किंगमेकर' का ठरू शकतं, हे आकडे पाहून सहज लक्षात येईल. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बहुतांश पक्षांनी, आपण कोणत्या गटाचे, हे आधीच जाहीर केलं आहे. एनडीए किंवा यूपीएसोबत नसलेले पक्षही काय वेळप्रसंगी आपलं कौल कुणाला देतील, हे स्पष्ट दिसतंय. याला तीन नेते अपवाद आहेत. ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बीजू जनता दलाचे नेते नवीन पटनायक, तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि टीआरएसचे नेते केसीआर आणि वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी या तिघांनीही आपले पत्ते अद्याप उघडलेले नाहीत. त्यामुळे लोकसभेचे निकाल त्रिशंकू लागल्यास या त्रिकुटाला 'अच्छे दिन' येतील.

ओडिशा (२१), आंध्र प्रदेश (२५) आणि तेलंगणा (१७) या तीन राज्यांमध्ये लोकसभेच्या ६३ जागा आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत बीजू जनता दलाने २०, वायएसआर काँग्रेसने ९ आणि टीआरएसने ११ जागा जिंकल्या होत्या. म्हणजेच, ६३ पैकी ४० खासदार या तीन पक्षांचे होते. यावेळी त्यांची ताकद वाढल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय. म्हणजेच, ते यावेळीही 'चाळिशी' सहज पार करू शकतात आणि त्या जोरावर भाजपा किंवा काँग्रेसला ४४० व्होल्टचा झटका देऊ शकतात. 

जगनमोहन रेड्डी पाठिंब्यासाठी 'रेडी', पण...

आंध्र प्रदेशच्या सर्व २५ जागांवर ११ एप्रिलला मतदान झालं आहे. इथे चंद्राबाबू नायडू यांचा टीडीपी आणि जगनमोहन रेड्डी यांचा वायएसआर काँग्रेस या दोन पक्षांमध्ये थेट लढत आहे. कुणाशीही आघाडी न करता, हे दोन्ही पक्ष स्वबळावर रिंगणात उतरलेत. चंद्राबाबूंनी मोदी सरकारविरोधात धडक मोर्चा उघडल्याचं पाहायला मिळालं. सत्तेतून बाहेर पडल्यावर त्यांची काँग्रेससोबतची जवळीक वाढली. एका म्यानात या दोन तलवारी राहणं थोडं कठीण असल्यानं जगनमोहन रेड्डी एनडीएच्या गोटात येऊ शकतात. अर्थात, जो आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देईल, त्याला पाठिंबा देण्याची भूमिका त्यांनी आधीच जाहीर केली आहे.    

पटनायक 'नवीन' भूमिका घेतील?

बीजू जनता दलाच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत कधीच नवीन पटनायक यांनी काँग्रेसशी 'हात'मिळवणी केलेली नाही. याउलट, भाजपासोबत युती करून ते निवडणूक लढलेत आणि सरकारमध्येही एकत्र राहिलेत. २००९ नंतर यंदा प्रथमच बीजेडीनं स्वबळावर निवडणूक लढवली आहे. त्यांची लढाई भाजपा आणि काँग्रेसशी आहे. प्रचारात या तीनही पक्षांनी एकमेकांवर जोरदार टीका केलीय. बीजेडी आत्तापर्यंत काँग्रेसपासून जितकी दूर होती, तितकीच ती भाजपापासूनही राहिली. पटनायक निकालांनंतर याच भूमिकेवर कायम राहतात की 'नवीन' भूमिका घेतात, हे पाहावं लागेल.

केसीआर... आर या पार?

अलीकडेच झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत के चंद्रशेखर राव यांच्या टीआरएसनं मुसंडी मारली होती. हे चित्र पाहता, तेलंगणामधील लोकसभेच्या १७ जागा भाजपा आणि काँग्रेससाठी 'खतरा' ठरू शकतात, असं स्पष्ट दिसतंय. सध्या तरी केसीआर यांना केंद्रात भाजपाचंही सरकार नकोय आणि काँग्रेसचंही. त्यादृष्टीनं त्यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चाही केलीय. परंतु, तिसऱ्या आघाडीची घडी बसण्याची शक्यता कमीच असल्यानं केसीआर आर की पार हे निकालांनंतरच कळेल. 

दरम्यान, भाजपाच्या जागा कमी होतील, पण एनडीए बहुमताचा आकडा पार करेल, असाही एक अंदाज आहे. तसं झाल्यास हे पक्ष फारसे प्रकाशझोतात येतील, असं वाटत नाही. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकOdisha Lok Sabha Election 2019ओडिशा लोकसभा निवडणूक 2019Telangana Lok Sabha Election 2019तेलंगाना लोकसभा निवडणूक 2019Andhra Pradesh Lok Sabha Election 2019आंध्रप्रदेश लोकसभा निवडणूक 2019