शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

चहावाल्याने जनतेचा विश्वासघात केला; अखिलेश यादव यांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2019 3:55 PM

अखिलेश यादव म्हणाले की, पंतप्रधान मोदींची आता पूर्णपणे पोलखोल झाली आहे. गेल्या वेळचा चहावाला आता चौकीदार झाला आहे. जो काहीच कामाचा नाही. राज्यातील नेतृत्व देखील चौकीदारचा समर्थक आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात ठोकोनिती सुरू झाल्याचा आरोप अखिलेश यांनी केला.

नवी दिल्ली - देशातील जनतेचा चहावाल्याने विश्वासघात केल्याची घणाघाती टीका समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव न घेता केली. कौशाम्बी मतदार संघातील उमदेवार इंद्रजीत सरोज आणि प्रतापगडचे उमेदवार अशोक त्रिपाठी यांच्यासाठी आयोजित संयुक्त प्रचार सभेत अखिलेश बोलत होते.

अखिलेश यादव म्हणाले की, पंतप्रधान मोदींची आता पूर्णपणे पोलखोल झाली आहे. गेल्या वेळचा चहावाला आता चौकीदार झाला आहे. जो काहीच कामाचा नाही. राज्यातील नेतृत्व देखील चौकीदारचा समर्थक आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात ठोकोनिती सुरू झाल्याचा आरोप अखिलेश यांनी केला. पोलिसांना अपमानित व्हावं लागत आहे. मात्र आगामी निवडणुकीत चौकीदार आणि ठोकीदार यांना घरी बसावे लागले, असंही अखिलेश यांनी सांगितले.

भाजपने जनतेला धोका दिला आहे. दोन कोटी नोकऱ्यांचे आणि शेतकऱ्यांना दिलेले आश्वासने पाळले नाहीत. देशाच्या अर्थव्यवस्थेची वाताहत झाली. भारत सरकारवर सध्या ८२ लाख कोटींचे कर्ज असल्याचं अखिलेश यांनी सांगितले. परंतु, लोकशाहीत कुणीही राजा नसतो, तर जनता राजा असते. सध्या राज्यात सपा-बसपा युतीची लाट आहे. त्यामुळे जनता ज्याला वाटेल त्याला राजा बनवणार आहे. ज्याच्या विरुद्ध असेल त्याला खुर्ची सोडावी लागेल, असं सांगताना अखिलेश यांनी भाजप कपटीपणाने निवडणुकीला सामोरे जात असल्याचा आरोप केला.

मतदानाच्या वेळी सायकलसमोरील बटन दाबल्याने चौकीदारी, ठोकीदार आणि धमकीदार या सगळ्यांची सुट्टी होणार आहे. जनतेत असलेला उत्साह पाहता देशात परिवर्तन होणार असं दिसत आहे. कुणालाही वाटत नव्हतं, सपा आणि बसपाची युती होईल. सपा-बसपाची युती म्हणजे शेतकऱ्यांची युती आहे. तरुण, बेरोजगार, दलित, मागास आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी ही युती झाल्याचे अखिलेश पुढे म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAkhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा