शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

Delhi Lok Sabha Election 2019: दिल्लीत काँग्रेस, 'आप'ला 'बसपा'चे आव्हान; चौरंगी लढत रंगणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 12:43 IST

पुढील दोन दिवसांत दिल्लीतील सातही बसपा उमेदवारांचे नाव निश्चित होणार असल्याचे सिंह यांनी सांगितले. दिल्लीत बसपाने निवडणूक लढविल्यास राजकीय समिकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

नवी दिल्ली - दिल्लीतकाँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यातील युतीसंदर्भात अजुनही काहीही निर्णय झाला नाही. त्यामुळे काँग्रेस, आप आणि भाजप अशी तिरंगी लढाई राजधानी दिल्लीत अपक्षीत होती. मात्र आता या लढाईत मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने एंट्री करण्याचं निश्चित केले आहे. त्यामुळे दिल्लीतील लोकसभा निवडणुकीत चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील माजी बसपा प्रमुख सी.पी. सिंह यांनी बसपा दिल्लीतील सातही जागा लढणार असल्याचे सांगितले.

पुढील दोन दिवसांत दिल्लीतील सातही बसपा उमेदवारांचे नाव निश्चित होणार असल्याचे सिंह यांनी सांगितले. दिल्लीत बसपाने निवडणूक लढविल्यास राजकीय समिकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

बसपाकडून १९८९ पासून दिल्लीत निवडणूक लढविण्यात येत आहे. दिल्लीत आपचा उद्य होण्यापूर्वी बसपाची भूमिका महत्त्वपूर्ण असायची. मात्र त्यांना एकही लोकसभा मतदार संघात विजय मिळवता आलेला नाही. मात्र २००८ मध्ये दोन विधानसभा मतदार संघात बसपाचे उमेदवार निवडून आले होते. तर सहा जागांवर १४.५ टक्के मतदान मिळवले होते.

दरम्यान काँग्रेस आणि आपमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून युतीच्या चर्चा आहेत. काँग्रेसला दिल्लीत तीन जागा हव्या आहेत. मात्र अद्याप यावर काहीही निर्णय झाला नाही. अनेकदा काँग्रेस-आप युतीची चर्चा फिसकटल्याचे वृत्त आले होते. त्याचवेळी युती होणार अशाही बातम्या प्रसिद्ध होतात. त्यात आता बसपाने उडी घेतल्यामुळे दिल्लीतील निवडणूक आणखीनच रंगतदार होणार आहे. दिल्लीत १.४ कोटी मतदार आहेत. यामध्ये १५ टक्के दलित असून बसपाचं या मतदारांवर लक्ष आहे.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीdelhiदिल्लीAAPआपcongressकाँग्रेसDelhi Lok Sabha Election 2019दिल्ली लोकसभा निवडणूक 2019