शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Lok Sabha Election 2019 : कोलकातामधील 'या' मतदान केंद्रावर होणार फेरमतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 11:35 IST

मतदानाच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात बऱ्याच ठिकाणी हिंसाचाराच्या घटना समोर आल्या. पश्चिम बंगालमधील कोलकाता उत्तर लोकसभा मतदार संघातील 200 क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील मतदान बाद झालं आहे.

ठळक मुद्देमतदानाच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात बऱ्याच ठिकाणी हिंसाचाराच्या घटना समोर आल्या.पश्चिम बंगालमधील कोलकाता उत्तर लोकसभा मतदार संघातील 200 क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील मतदान बाद झालं आहे. 22 मे रोजी फेरमतदान घेण्यात येणार आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचे सात टप्प्यात घेण्यात आलेले मतदान 19 मे रोजी संपले. मतदानाच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात बऱ्याच ठिकाणी हिंसाचाराच्या घटना समोर आल्या. पश्चिम बंगालमधील कोलकाता उत्तर लोकसभा मतदार संघातील 200 क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील मतदान बाद झालं आहे. 22 मे रोजी म्हणजेच लोकसभा निवडणूक निकालाच्या आदल्यादिवशी फेरमतदान घेण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने याबाबतची माहिती दिली आहे. 

22 मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत फेरमतदान घेण्यात येणार आहे. पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या आधी तसेच मतदानाच्या दिवशी मोठा हिंसाचार उफाळला होता. त्यामुळे अनेक नेत्यांनी अशा वादग्रस्त मतदान केंद्रावर पुन्हा मतदान घ्यावं अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्यावेळी ज्या ठिकाणी हिंसा घडली तिथे पुन्हा मतदान घ्यावे अशी मागणी  केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. याविषयी गोयल यांची निवडणूक आयोगासोबत बैठक घेतली झाली. आमच्या कार्यकर्त्यांसोबत झालेल्या मारहाण प्रकरणी आम्ही निवडणूक आयोगाशी चर्चा केल्याचं गोयल यांनी म्हटलं होतं. 

पहिल्या टप्प्यातील मतदानाच्यावेळी किरकोळ हिंसाचाराच्या घटना समोर आल्या होत्या. शेवटच्या टप्प्यात मात्र हे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळाले. तनरतारन येथे झालेल्या चकमकीत काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता. तसेच अनेकजण जखमी झाले होते. हिंसाचाराच्या सर्वाधिक घटना पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळाल्या. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या प्रत्येक मतदानाच्या टप्प्यात तोडफोड आणि मारहाणीच्या घटना समोर आल्या होत्या. 

सहाव्या टप्प्यात पश्चिम बंगालमधील घटाल मतदारसंघात भाजपच्या उमेदवार व माजी आयपीएस अधिकारी भारती घोष यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता. केशपूर येथे मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती कळताच त्या तिथे गेल्या. तेव्हा त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. गावठी बॉम्बचाही स्फोट घडविण्यात आला. हा हिंसाचार तृणमूल काँग्रेसने घडविला असून त्याची निवडणूक आयोगाने चौकशी करावी, अशी मागणी भाजपा नेते प्रकाश जावडेकर यांनी केली होती.

 

टॅग्स :West Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019VotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग