शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

२० सुत्री; इंदिराजींची अन् राहुलचीही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 12:11 IST

१९७५ मध्ये इंदिरा गांधी यांनी गरीबी हटविण्यासाठी २० सुत्री कार्यक्रम राबविला होता. त्याला मोठ्या प्रमाणात यशही आले होते.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोठी घोषणा केली आहे. सत्तेत आल्यास प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 72 हजार रुपये देण्याची घोषणा राहुल गांधींनी केली आहे. देशातील २० टक्के लोकांना या योजनेचा लाभ मिळेल, असं आश्वासन त्यांनी दिलं. यापूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देखील 'गरिबी हटाव'चा नारा दिला होता. १९७५ मध्ये इंदिरा गांधी यांनी गरीबी हटविण्यासाठी २० सुत्री कार्यक्रम राबविला होता. त्याला मोठ्या प्रमाणात यशही आले होते.

इंदिरा गांधी यांनी सर्वसामान्यांना केंद्रबिंदू ठरवून २० सुत्री कार्यक्रम राबविला होता. त्याचीच पुनरावृत्ती काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी करत नाही ना, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. इंदिरा गांधी यांच्या २० सुत्री कार्यक्रमात पुढील बाबींचा समावेश होता.

१. ग्रामीण भागातील गरीबी हटविणे

२. कृषी क्षेत्रासाठी वार्षिक रणनिती

३. सिंचन व्यवस्थेसाठी परिणामकारक योजना

४. उत्पादनात वाढ

५. जमीन सुधारणा प्रवर्तन

६. ग्रामीण मजुरांसाठी खास कार्यक्रम

७. स्वच्छ पिण्याचे पाणी

८. सर्वांसाठी आरोग्य

९. लोकसंख्या नियंत्रण

१०. शिक्षणाचा विस्तार

११. अनुसुचित जाती/ जमातींना न्याय

१२. महिलांसाठी समानता

१३. महिलांसाठी नवीन संधी

१४. सर्वांसाठी घर

१५. झोपडपट्टी सुधार

१६. व्यावसायासाठी रणनिती

१७. पर्यावरण संरक्षण

१८. ग्राहक समस्या सोडविणे

१९. प्रत्येक गावांत वीज

२०. जबाबदार प्रशासन

काय आहे, राहुल गांधी यांची योजना

आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबांना वर्षाकाठी ७२ हजार रुपये देण्यात येतील. ही रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाईल. देशातील 5 कोटी कुटुंबांना, म्हणजेच जवळपास २५कोटी लोकांना याचा फायदा होईल, असा दावा राहुल गांधींना केला. जगातील कोणत्याही देशात अशी योजना नाही, असा दावादेखील त्यांनी केला. 'काँग्रेसनं जगातील प्रख्यात अर्थतज्ज्ञांशी चर्चा करुन योजना तयार केली आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यास देशभरात टप्प्याटप्प्यात ही योजना लागू करण्यात येईल,' अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान इंदिरा गांधी यांच्या २० सुत्री कार्यक्रमामुळे सर्वसामान्यांच जीवनमान सुधारण्यास मदत झाली होती. तसेच या कार्यक्रमामुळे काँग्रेसला फायदाच झाला होता. आता राहुल यांनी केलेल्या घोषणेचा फायदा या निवडणुकीत काँग्रेसला होईल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसIndira Gandhiइंदिरा गांधीRahul Gandhiराहुल गांधी