शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

पंतप्रधानांनी पाय धुतल्याची लाज वाटते; 'त्या' सफाई कामगारांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 12:46 IST

आम्हाला कामाचा खूप थोडा मोबदला मिळतो. यात घर चालविणे कठिण आहे. सर्वांना घरं, गॅस मिळाले, आम्ही काहीही मिळालं नसून अजुनही आम्ही चुलीवरच स्वयंपाक बनवत असल्याचे सफाई कामगार महिलेने म्हटले.

मुंबई - काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभ मेळाव्यात सफाई कामगारांचे पाय धुतले होते. तसेच या कामगारांविषयी कृतज्ञता व्यक्त केली होती. परंतु, पंतप्रधानांनी पाय धुतल्यानंतरही या कामगारांच्या आयुष्यात काहीही बदल झाला नसल्याचे समोर आले आहे. या संदर्भात सफाई कामगारांशी बीबीसी हिंदीने घेतलेल्या मुलाखतीतून अनेक बाबी समोर आल्या आहेत.

सफाई कामगारांपैकी एक महिला दलित आहे. या महिलेचा समावेश त्या पाच सफाई कामगारांमध्ये होता, ज्यांचे पाय मोदींनी धुतले होते. आमचे पाय धुतल्याने आयुष्यात काहीही बदल झाला नसल्याचे महिलेचे म्हणणे आहे. आम्हाला कामाचा खूप थोडा मोबदला मिळतो. यात घर चालविणे कठिण आहे. सर्वांना घरं, गॅस मिळाले, आम्ही काहीही मिळालं नसून अजुनही आम्ही चुलीवरच स्वयंपाक बनवत असल्याचे महिलेने म्हटले. तर महिलेच्या पतीने पंतप्रधानांकडून सरकारी नोकरी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली.

सफाई कामगारांमध्ये असलेल्या ज्योती नावाच्या महिलेने देखील आपले मत व्यक्त केले. पंतप्रधानांनी आमचे पाय धुतल्याची शरम वाटते. एवढ्या मोठ्या माणसाचे पाय आम्ही धुवायला हवे होते. मोदींनी पाय धुतल्याने केवळ सन्मान मिळाला. आयुष्यात काहीही बदल झाला नाही. असंही ज्योती यांनी म्हटले आहे. केवळ हाताला काम हवं, एवढीच इच्छा ज्योती यांनी व्यक्त केली.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार देशात सुरू आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या विविध कामांचं सत्य विरोधकांकडून समोर आणले जात आहे. महाराष्ट्रात देखील राज ठाकरे यांनी पहिले डिजीटल गाव असलेल्या हरिसालमधील सत्य परिस्थिती समोर आणली होती. आता सफाई कामगारांची माहिती समोर आली आहे. यावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीKumbh Melaकुंभ मेळा