शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'एक्झिट पोल'मुळे विरोधक संभ्रमात, तर काँग्रेसला २००४ च्या पुनरावृत्तीची आस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 10:21 IST

काँग्रेसला अशी आस असण्यामागे कारणही तसचं आहे. काँग्रेस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतर्गत सर्व्हेत काँग्रेसला १४० च्या जवळपास जागा दाखविण्यात आल्या आहेत. तर भारतीय जनता पक्ष १८० जागांपर्यंतच मजल मारू शकेल.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी आता एक दिवस शिल्लक आहे. निवडणुकीसंदर्भात आलेल्या एक्झिट पोलनुसार एनडीएला बहुमत मिळणार आहे. एक्झिट पोलमुळे विरोधकांना धडकी भरली असून त्यामुळे विरोधकांच्या मोर्चेबांधणीची गती मंदावली आहे. विरोधक जरी संभ्रमात असले तरी काँग्रेसला मात्र २००४ लोकसभा निवडणूक निकालाच्या पुनरावृत्तीची आशा आहे. २००४ मध्ये काँग्रेसला १४५ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर काँग्रेसने इतर पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन केले होते.

काँग्रेसला अशी आस असण्यामागे कारणही तसचं आहे. काँग्रेस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतर्गत सर्व्हेत काँग्रेसला १४० च्या जवळपास जागा दाखविण्यात आल्या आहेत. तर भारतीय जनता पक्ष १८० जागांपर्यंतच मजल मारू शकेल. आता एक्झिट पोल आल्यानंतर देखील काँग्रेसनुसार भाजप २०० च्या आतच राहिल. तसेच पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये भाजपला एक्झिट पोलमध्ये दाखविण्यात येत असलेल्या जागा मिळणे कठिण आहे. तसेच ज्या राज्यात २०१४ मध्ये भाजप आघाडीवर होते, तिथे भाजपला नुकसान होणे निश्चित असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.

एक्झिट पोलमध्ये भाजपच्या विजयाचा करण्यात आलेला दावा काँग्रेसनेच नव्हे तर बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षाने देखील फेटाळला आहे. सपाचे महासचिव रामगोपाल यादव म्हणाले की, २३ मे रोजी सर्व एक्झिट पोल कोसळणार आहेत. तर बहुजन समाज पक्षाच्या सतीश चंद मिश्रा यांनी एक्झिट पोलच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दुसरीकडे तेलगू देसम पार्टीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू आपला एक्झिट दाखवून विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत. नायडू यांच्यानुसार काँग्रेसला १२९ आणि भाजपला १७९ जागा मिळतील.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेसBJPभाजपाexit pollमतदानोत्जतर जनमत चाचणी