शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

प्रज्ञा ठाकूरची हकालपट्टी करून भाजपने राजधर्म पाळावा : सत्यार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 17:30 IST

नथुराम गोडसेने महात्मा गांधींच्या शरिराची हत्या केली होती. परंतु, प्रज्ञा ठाकूर यांच्यासारखे लोक गांधीजींच्या आत्म्यासह अहिंसा, शांती, सहिष्णुता आणि भारताच्या आत्म्याची हत्या करत आहेत.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान अद्याप राहिले असून वादग्रस्त वक्तव्यांची मालिका थांबली नसल्याचे चित्र आहे. भाजपची भोपाळ लोकसभा मतदार संघातील उमेदवार आणि मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूरने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले. यावेळी प्रज्ञा ठाकूरने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथूराम गोडसेला देशभक्त म्हटले. यावर नोबल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच भाजपला खडे बोल सुनावले आहेत.

भारतीय जनता पक्षाने छोटासा राजकीय फायदा न पाहता राजधर्म पाळावा असं आवाहन सत्यार्थी यांनी केले आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले की, नथुराम गोडसेने महात्मा गांधींच्या शरिराची हत्या केली होती. परंतु, प्रज्ञा ठाकूर यांच्यासारखे लोक गांधीजींच्या आत्म्यासह अहिंसा, शांती, सहिष्णुता आणि भारताच्या आत्म्याची हत्या करत आहेत. गांधीजी सत्ता आणि राजकारणाच्या पलिकडे आहेत. त्यामुळे भाजप नेतृत्वाने छोटासा फायदा सोडून प्रज्ञा ठाकूरची पक्षातून हकालपट्टी करत राजधर्माचे पालन करावे, असे सत्यार्थी यांनी म्हटले आहे.

प्रज्ञा ठाकूर हिने महात्मा गांधींचा खुनी नथुराम गोडसे याला देशभक्त म्हटले होते. या वक्तव्यानंतर प्रज्ञा ठाकूरवर सर्वच स्तरातून टीका करण्यात आली. त्यानंतर प्रज्ञा ठाकूरने ट्विटरवरून माफी मागितली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील प्रज्ञा ठाकूरच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. महात्मा गांधी आणि गोडसे संदर्भात केलेले वक्तव्य घृणास्पद असल्याचे मोदींनी म्हटले होते. मात्र सत्यार्थी यांची मागणी मान्य करून मोदी राजधर्म पाळणार हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Sadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञाBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी