शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

जनादेश पवित्र, त्यात संशयाला जागा नसावी; ईव्हीएम छेडछाडीच्या आरोपांवर प्रणव मुखर्जींचं भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 19:11 IST

ईव्हीएमच्या सुरक्षेची जबाबदारी निवडणूक आयोगाची

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. बहुतांश एक्झिट पोल्समधून भाजपा पुन्हा सत्तेत येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर विरोधकांनी ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचे आरोप केले. याबद्दल आज दिल्लीत 19 पक्षांची बैठकदेखील झाली. यानंतर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीदेखील चिंता व्यक्त केली. ईव्हीएम निवडणूक आयोगाच्या ताब्यात आहेत. त्यामुळे त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आयोगाची आहे, असं मुखर्जींनी म्हटलं आहे. ईव्हीएमच्या वाहतुकीत हलगर्जीपणा होत असल्याच्या घटना सकाळपासून समोर आल्या. त्याबद्दल मुखर्जींनी चिंता व्यक्त केली. 'आपल्या लोकशाहीच्या गाभ्यालाच आव्हान देणाऱ्या अशा प्रकारच्या शंकांना स्थान असता कामा नये. जनादेश पवित्र आहे आणि त्यात संशयाला कोणतीही जागा नसावी,' असं मुखर्जींनी त्यांच्या निवेदनात नमूद केलं आहे. ईव्हीएम सुरक्षित राखण्याची आणि सर्व शंकांचं निरसन करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असल्याचंदेखील त्यांनी निवेदनात म्हटलं आहे.एक्झिट पोल्सचे आकडे प्रसिद्ध झाल्यानंतर विरोधकांच्या गोटात अस्वस्थता आहे. आज दुपारी दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये 19 विरोधी पक्षांची बैठक झाली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला निवडणूक आयोगाकडे ईव्हीएमबद्दल तक्रार करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर विरोधक निवडणूक आयोगाच्या मुख्यालयात जाण्यासाठी रवाना झाले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग