शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

Lok Sabha Election 2019 : आणि रेहान वाड्रा याची पहिल्यांदा मतदान करण्याची संधी हुकली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 11:07 IST

यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आदींनीही मतदानाचा हक्क बजावला. प्रियंका गांधी मतदान करण्यास आल्या त्यावेळी सोबत त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा हे देखील होते. मात्र त्यांचा मुलगा रेहान वाड्रा (19) हा मतदानावेळी उपस्थित नव्हता. 

ठळक मुद्देयूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आदींनीही मतदानाचा हक्क बजावला. प्रियंका गांधी मतदान करण्यास आल्या त्यावेळी सोबत त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा हे देखील होते. मात्र त्यांचा मुलगा रेहान वाड्रा (19) हा मतदानावेळी उपस्थित नव्हता.  पत्रकारांनी रविवारी यासंदर्भात प्रियंका गांधी यांना रेहानने मतदान का केले नाही असा प्रश्न विचारला. त्यावर 'रेहानची परीक्षा सुरू असून त्यासाठी तो लंडनला गेला आहे' असं उत्तर प्रियंका गांधी यांनी दिलं.'

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री व भाजपा नेत्या मनेका गांधी, काँग्रेसचे ज्योतिरादित्य सिंदिया, शीला दीक्षित, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव अशा अनेक बड्या उमेदवारांचे भवितव्य लोकसभेच्या सहाव्या टप्प्यात झालेल्या मतदानात रविवारी (13 मे) ईव्हीएमबंद झाले. सात राज्यांत 59 लोकसभा जागांसाठी रविवारी सरासरी 63.3 टक्के इतके मतदान झाले.  राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आदींनीही मतदानाचा हक्क बजावला. प्रियंका गांधी मतदान करण्यास आल्या त्यावेळी सोबत त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा हे देखील होते. मात्र त्यांचा मुलगा रेहान वाड्रा  (19) हा मतदानावेळी उपस्थित नव्हता. 

उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान प्रियंका गांधी यांच्यासह त्यांचा मुलगा रेहान आणि मुलगी मिराया उपस्थित होते. तसेच यावर्षी रेहान पहिल्यांदाच मतदान करणार होता. मात्र त्याने मतदान केले नाही. पत्रकारांनी रविवारी यासंदर्भात प्रियंका गांधी यांना रेहानने मतदान का केले नाही असा प्रश्न विचारला. त्यावर 'रेहानची परीक्षा सुरू असून त्यासाठी तो लंडनला गेला आहे' असं उत्तर प्रियंका गांधी यांनी दिलं.' परीक्षेमुळे मतदान करता आलं नसल्याचं त्यांनी पत्रकारांना सांगितलं. 

सध्या सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारविरोधात देशातील जनतेच्या मनात आक्रोश आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपाचा पराभव होणे निश्चित आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी रविवारी दिली. प्रियंका गांधी यांनी दिल्लीतील लोढी इस्टेट येथील सरदार पटेल विद्यालयात मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. ''यंदाची लोकसभेची निवडणूक लोकशाही आणि देशाला वाचवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे मतदान करताना ही बाब लक्षात ठेवा.  या निवडणुकीदम्यान देशातील जनतेमध्ये सरकारविरोधात मोठ्या प्रमाणावर आक्रोश दिसत होता. त्यामुळे भाजपाचा पराभव होणार हे स्पष्ट आहे.'' असे प्रियंका गांधी म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिलेल्या आश्वासनांबाबत काहीच बोलत नाही. दोन कोटी नोकऱ्यांचे आश्वासन, प्रत्येकाला 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन याबाबत बोलण्याऐवजी नरेंद्र मोदी हे वायफळ विषयांवर बोलत आहेत. असा टोलाही प्रियंका गांधी यांनी यावेळी लगावला. 

सहाव्या टप्प्याला हिंसाचाराचे गालबोट; देशात 63% मतदान, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 80 टक्के

सात राज्यांत 59 लोकसभा जागांसाठी रविवारी सरासरी 63.3 टक्के इतके मतदान झाले. तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी व भाजपामधील कडव्या संघर्षामुळे गाजत असलेल्या पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 80.13 टक्के मतदान झाले. परंतु या राज्यात तुरळक हिंसाचाराचे गालबोट लागले. पश्चिम बंगालमधील घटाल मतदारसंघात भाजपच्या उमेदवार व माजी आयपीएस अधिकारी भारती घोष यांच्यावर ताफ्यावर हल्ला झाला. केशपूर येथे मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती कळताच त्या तिथे गेल्या. तेव्हा त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. गावठी बॉम्बचाही स्फोट घडविण्यात आला. या घटनेत घोष यांचा एक अंगरक्षक जखमी झाला व ताफ्यातील एका वाहनाची नासधूस झाली आहे. यावेळी घोष यांच्याबरोबर असलेल्या केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानाने केलेल्या गोळीबारात तृणमूल काँग्रेसचा एक जण जखमी झाला आहे. हा हिंसाचार तृणमूल काँग्रेसने घडविला असून त्याची निवडणूक आयोगाने चौकशी करावी, अशी मागणी भाजपा नेते प्रकाश जावडेकर यांनी केली आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील मतदारांना प्रभावित करण्यासाठी भाजपा आणि आरएसएसचे कार्यकर्ते सुरक्षा दलांच्या वेशात येत आहेत, असा आरोप केला.बिहारमधील शेओहर लोकसभा मतदारसंघात होमगार्डच्या बंदूकीतून चुकून उडालेली गोळी लागून एक निवडणूक कर्मचारी ठार झाला. बिहारच्या पश्चिम चंपारण मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संजय जयस्वाल यांनाही काही जणांनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण केल्याचे समजते. हरयाणामध्ये जिंद जिल्ह्यात तीन बूथवरील ईव्हीएम यंत्रांवर आपले निवडणूक चिन्ह नीट दिसत नसल्याची तक्रार जननायक जनता पार्टीचे उमेदवार दिग्विजय चौटाला यांनी केली. अन्य राज्यांतही काही ठिकाणी मतदान केंद्र ताब्यात घेण्याचे प्रयत्न झाल्याच्या तक्रारी आहेत. या 59 मतदारसंघातील सर्वाधिक 43 जागा भाजपाकडे होत्या. या जागा राखणे हे भाजपापुढे मोठे आव्हान असणार आहे. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस