शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मसूद अजहरला सोडणारं भाजपच; मोदींनी त्याचं उत्तर द्यावं : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 14:44 IST

ज्या मसूद अजहरवर मोदी बोलत आहेत, त्याला काँग्रेसच्या काळात पकडण्यात आले होते. मात्र भाजपने त्याला कंधारपर्यंत नेऊन सोडले. यावर पंतप्रधान मोदींनी उत्तर द्यावे अशी मागणी राहुल यांनी केली.

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार टीका केली. मसूद अजहरच्या मुद्दावरून राहुल गांधी यांनी मोदींना जाब विचारला आहे. जागतिक पातळीवर मसूद अजहरला अतिरेकी घोषित करण्यात आल्यानंतर या घोषणेमुळे काँग्रेसच्या पोटात दुखत असल्याचे वक्तव्य पंतप्रधान मोदींनी एका सभेत केले होते. त्याला राहुल गांधी यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

राष्ट्रवादावर बोलताना राहुल म्हणाले की, २००४ मध्ये काश्मीर जळत होते. त्यावेळी काँग्रेसने तेथील परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली. मात्र मोदींनी तेथील स्थिती खराब केली. काँग्रेसने अतिरेक्यांवर अंकूश ठेवला होता. ज्या मसूद अजहरवर मोदी बोलत आहेत, त्याला काँग्रेसच्या काळात पकडण्यात आले होते. मात्र भाजपने त्याला कंधारपर्यंत नेऊन सोडले. यावर पंतप्रधान मोदींनी उत्तर द्यावे अशी मागणी राहुल यांनी केली.

राष्ट्रीय सुरक्षा देशासाठी महत्त्वाची आहे. यामध्ये काँग्रेसचा रेकॉर्ड उत्तम आहे. काश्मीरमधील आतंकवाद आम्ही रोखला. परंतु, मोदींनी आतंकवादासाठी देशाचे द्वार खुले करून दिले. मसूद अजहरला यांनीच सोडून दिले. त्यावर मोदी काहीच बोलत नाहीत. राष्ट्रीय सुरक्षेसह बेरोजगारी देखील देशासमोरची मोठी समस्या आहे. मोदींनी देशाला बेरोजगारीच्या खाईत ढकलले. त्यावर मोदींकडे काही उत्तर आहे का, असा सवाल राहुल यांनी केला.

मोदींचा पराभव निश्चित

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव होणार हा देशाचा आवाज आहे. मोदींनी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. ते शक्यही होते. मात्र आज देशात मागील ४५ वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक बेरोजगारी वाढली आहे. त्यांनी १५ लाखांचे आश्वासन दिले, पण ते देखील जुमला ठरले. आम्ही पाच वर्षांत ३ लाख ६० हजार, २२ लाख नोकऱ्या देणार आहोत. ही लढाई सत्याची आहे. आमच्या बाजूने सत्य आहे. त्यामुळे मोदींचा पराभव होणार असं, राहुल यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाmasood azharमसूद अजहर