शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

लालूंचा विश्वास सार्थ ठरविण्यात तेजस्वी अपयशी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 15:35 IST

बिहारमध्ये भाजप, जदयू आणि लोजपा यांची युती मजबूत स्थितीत आहे. तर राष्ट्रीय जनता दल-काँग्रेस-रालोसपा-हम-आरएलएसपी आणि व्हीआयपी यांची महाआघाडी पूर्णपणे अपयशी ठरण्याची शक्यता आहे.

- राजा मानेमुंबई - लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान रविवारी संपन्न झाले. त्यानंतर काही वेळातच वृत्तवाहिन्यांवर एक्झिट पोल धडकले. या एक्झिट पोलमध्ये भाजपप्रणीत एनडीएला बहुमत तर महाआघाडीला मोठा धक्का बसणार असल्याचे आकडे समोर आले आहेत. बिहारध्ये 'एनडीए'चे पारडे इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे अनेक नेत्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार असून लालू प्रसाद यादव यांच्या भवितव्यावर देखील चर्चा रंगत आहे.सर्वाधिक आश्चर्यचकीत करणारे एक्झिट पोल बिहारमधून आले आहेत. येथे भाजप, जदयू आणि लोजपा यांची युती मजबूत स्थितीत आहे. तर राष्ट्रीय जनता दल-काँग्रेस-रालोसपा-हम-आरएलएसपी आणि व्हीआयपी यांची महाआघाडी पूर्णपणे अपयशी ठरण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलची आकडेवारी निकालात खरी ठरली तर भाजप आणि नितीश कुमार यांची दोस्ती आणखीनच घट्ट होणार आहे.

लालू प्रसाद यादव कारागृहात गेल्यानंतर महायुतीचे नेतृत्व तेजस्वी यादव करत आहेत. मात्र एक्झिट पोलमुळे तेजस्वी यादव यांच्या नेतृत्व कौशल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 'राजद'कडून पक्षाचे नेतृत्व तेजस्वी यांच्याकडे देण्यात आले आहे. तेजस्वी यादव प्रथमच लालू यांच्या गैरहजेरीत निवडणूक लढवत आहेत. त्यांना या निवडणुकीत पक्षात आणि कुटुंबात देखील मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागले. मात्र याचा सामना करत तेजस्वी यांनी लालूंच्या पावलावर पाउल ठेवत सामाजिक न्यायाला आपला प्रमुख मुद्दा बनवलं.

तेजस्वी यांनी काँग्रेससह इतर पक्षांना सोबत घेत भाजपला शह देण्याचा प्रयत्न केला. मात्र तेजस्वी यांची मात्र भाजपच्या चक्रव्युहाला भेदताना दिसून येत नाही. ज्याप्रमाणे लालू यांनी विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या साथीत भाजपला दूर ठेवले होते, तसा चमत्कार तेजस्वी यांना करता येईल, अशी शक्यता कमीच आहे.एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार मोदी-नितीश-पासवान यांच्यासमोर तेजस्वीचे नेतृत्व कमकुवत दिसून आले. तसेच राहुल गांधी यांच्याशी केलेली मैत्री देखील तेजस्वी यांच्यासाठी फायदेशीर ठरताना दिसत नाही. महाआघाडीची बोलणी सुरू असतानाच लालूंच्या गैरहजेरीमुळे जागावाटपावरून बरीच ओढातान झाली. याचं नुकसान महाआघाडीलाच झाले असून तेजस्वी यांची सुरुवातच काहीशी वाईट झाली होती.दरम्यान लालू यादव यांना षडयंत्र रचून कारागृहात टाकल्याचा मुद्दा तेजस्वी यांच्यासह राबडीदेवी आणि मीसा भारती यांनी जनतेसमोर मांडला. मात्र एक्झिट पोलवरून हा भावनात्मक मुद्दा देखील उपयोगी ठरला नसल्याचे चित्र आहे. काँग्रेस-राजदमधील अनेक दिग्गज नेते पराभवाच्या छायेत आहेत. तर महाआघाडीतील इतर पक्षांच्या विजयाची धुसर शक्यता आहे. परंतु, महाआघाडीतील प्रत्येक उमेदवाराचा विजय तेजस्वी यांच्या राजकीय कारकिर्दीचे भविष्य ठरवणारा आहे. पुढीलवर्षी लगेच बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे ही लोकसभा निवडणूक तेजस्वी यांच्यासाठी लिटमस टेस्ट ठरणार आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवTejashwi Yadavतेजस्वी यादवBiharबिहारcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा