शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

जाणून घ्या, मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या 'अमीट शाई'विषयक रंजक गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 13:23 IST

निवडणूक आयोगाला दोन वेळा मतदान करण्याची तक्रारी मिळाल्या, त्यानंतर निवडणूक आयोगाने अशा समस्या सोडविण्यासाठी पर्यायांचा शोध घेतला. यामध्ये सर्वात चांगला पर्याय म्हणजे अमिट शाईचा होता.

मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची तयारी जोरात सुरू आहे. पहिल्या टप्प्यांतील निवडणुकीसाठी अनेकांनी आपले नामनिर्देशन सादर केले आहे. निवडणूक म्हणजे दर पाच वर्षांनी येणारा लोकशाहीचा उत्सवच. या निवडणुकीत एक गोष्ट फार महत्त्वाची असते. ती म्हणजे मतदान केल्यानंतर बोटावर लावण्यात येणारी शाई. या शाईविषयी अनेक गंमतीदार गोष्टी आहोत.

भारत स्वातंत्र झाल्यानंतर पहिल्यांदा १९५१-५२ मध्ये निवडणूक झाली. त्यावेळी मतदान केल्यानंतर मतदारांच्या बोटावर शाई लावण्याची पद्धत नव्हती. परंतु, निवडणूक आयोगाला दोन वेळा मतदान करण्याची तक्रारी मिळाल्या, त्यानंतर निवडणूक आयोगाने अशा समस्या सोडविण्यासाठी पर्यायांचा शोध घेतला. यामध्ये सर्वात चांगला पर्याय म्हणजे अमिट शाईचा होता.

शाईसाठी घेतली 'एनपीएल'ची मदत

शाई तयार करण्यासाठी निवडणूक आयोगाने त्यावेळी नॅशनल फिजीकल लॅबोरटरी ऑफ इंडियाला (एनपीएल) एक विशिष्ट प्रकारची शाई बनविण्याच्या सूचना केल्या. तसेच ती शाई पाण्याने किंवा कुठल्याही केमिकलने धुतली जाऊ नये, अशा सुचना केल्या होत्या. त्यानंतर एनपीएलने म्हैसूर पेंट अॅन्ड वार्निश कंपनीला तशी शाई बनविण्याची ऑर्डर दिली होती.

शाईचा पहिल्यांदा वापर

१९६२ मध्ये झालेल्या निवडणुकीत अमिट शाईचा पहिल्यांदा वापर करण्यात आला. तेव्हापासून ही शाई प्रत्येक निवडणुकीत वापरण्यात येते. मतदान केल्यानंतर बोटावर शाई लावण्याचा अर्थ असा होतो की, मतदाराने आधी मतदान केले आहे. बोटाला लावलेली ही शाई तब्बल १५ दिवस पुसली जात नाही, हे विशेष.

उन्हात आणखीनच घट्ट होते शाई

निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या शाईचा फॉर्म्युला एनपीएल आणि म्हैसूर पेंट अॅन्ड वार्निश कंपनीने गुप्त ठेवला आहे. याचा फॉर्म्युला जाहीर केल्यास ती मिटविण्यासाठी लोक नवीन फॉर्म्युला शोधून काढतील, अशी शका निवडणूक आयोगाला आहे. जाणकारांच्या मते या शाईमध्ये सिल्व्हर नायट्रेट मिसळलेले असते. त्यामुळे उन्हात येताच ही शाई आणखी घट्ट होते.

अनेक देशांमध्ये या शाईचा वापर

जगभरात तब्बल २८ देशांमध्ये अमिट शाईचा वापर करण्यात येतो. यामध्ये तुर्की, नायजेरीया, अफगानिस्तान, दक्षिण आफ्रिका, नेपाळ, घाना, कॅनडा, मलेशिया, मालदीव आणि कंबोडीया यासारख्या अनेक देशांचा समावेश आहे. कंबोडीया आणि मालदीवमध्ये मतदान केल्यानंतर मतदाराचे बोटच शाईमध्ये बुडविण्यात येते.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूकIndiaभारत