शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

रांचीमध्ये ‘इंडिया’च्या सभेत कार्यकर्ते भिडले; एकमेकांना फेकून मारल्या खुर्च्या, समोर आलं असं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 09:36 IST

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, विरोधी पक्षांचं ऐक्य दाखवण्यासाठी रविवारी इंडिया आघाडीची (INDIA Opposition Alliance) उलगुलान सभा झारखंडमधील रांची येथे आयोजित करण्यात आली होती. मात्र ही सभा विरोधी पक्षांच्या ऐक्यापेक्षा इंडिया आघाडीतील घटक पक्षामधील हाणामारीमुळेच अधिक चर्चेत आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, विरोधी पक्षांचं ऐक्य दाखवण्यासाठी रविवारी इंडिया आघाडीची उलगुलान सभा झारखंडमधील रांची येथे आयोजित करण्यात आली होती. मात्र ही सभा विरोधी पक्षांच्या ऐक्यापेक्षा इंडिया आघाडीतील घटक पक्षामधील हाणामारीमुळेच अधिक चर्चेत आली आहे. या सभेमध्ये झारखंडमधील चतरा लोकसभा मतदारसंघातील के. एन. त्रिपाठी यांच्या उमेदवारीवरून आरजेडी आणि काँग्रेसचे समर्थक आमने-सामने आले. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. तसेच खुर्च्यांची फेकाफेकी आणि धक्काबुक्कीमध्ये काही कार्यकर्ते जखमी झाले. 

चतरा लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसने के.एन. त्रिपाठी यांना उमेदवारी दिली आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीला सभेदरम्यान आरजेडीच्या कार्यकर्त्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली. हळूहळू प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. तसेच दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खुर्च्या फेकण्यास सुरुवात केली. एकमेकांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या हाणामारीत काँग्रेस उमेदवाराच्या भावाच्या डोक्याला दुखापत झाली. तसेच इतर ३ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. 

दरम्यान, एकीकडे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी सुरू असताना दुसरीकडे मंचावरून इंडिया आघाडीच्या नेत्यांची भाषणं मात्र सुरू होती. या सभेमध्ये झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन, सपाचे प्रमुख अखिलेश यादव, आरजेडीचे नेत तेजस्वी यादव, हेमंत सोरेन यांची पत्नी कल्पना सोरेन, अरविंद केजरीवाल यांची पत्नी सुनिता केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आदी नेत्यांनी यावेळी भाषणं दिली.

दरम्यान, काँग्रेसचे उमेदवार के. एन. त्रिपाठी यांच्याविरोधात काँग्रेसच्या कार्यालयामध्ये खूप नाराजी दिसून आली. त्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. या घटनेवरून भाजपा नेते बिरंची नारायण यांनी इंडिया आघाडीला टोला लगावला आहे. सिनेमा येण्यापूर्वीचा ट्रेलर प्रसिद्ध झाला आहे. या आघाडीचं चरित्र लोकांनी पाहिलं आहे. त्यात सगळे विदूषक भरलेले आहेत. या आघाडीच्या माध्यमातून झारखंडमधील जनतेचं कल्याण होणार नाही.   

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलcongressकाँग्रेसjharkhand lok sabha election 2024झारखंड लोकसभा निवडणूक निकाल २०२४