शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

अमेठी, रायबरेलीत काँग्रेसच्या हाताला सपाच्या सायकलची साथ, अखिलेश यादव यांचे कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2024 16:51 IST

Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: उत्तर प्रदेशमधील अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघातील लढत ही काँग्रेससाठी प्रतिष्ठेचा विषय बनली आहे. त्यातही रायबरेलीमधून यावेळी राहुल गांधी हे निवडणूक लढवत असल्याने या जागेचं महत्त्व आणखीनच वाढलं आहे. मात्र या दोन्ही मतदारसंघातील समिकरणं पाहता येथे विजयासाठी काँग्रेसला समाजवादी पक्षाच्या मदतीवर अवलंबून राहणार आहे.

उत्तर प्रदेशमधील अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघातील लढत ही काँग्रेससाठी प्रतिष्ठेचा विषय बनली आहे. त्यातही रायबरेलीमधून यावेळी राहुल गांधी हे निवडणूक लढवत असल्याने या जागेचं महत्त्व आणखीनच वाढलं आहे. मात्र या दोन्ही मतदारसंघातील समिकरणं पाहता येथे विजयासाठी काँग्रेसला समाजवादी पक्षाच्या मदतीवर अवलंबून राहणार आहे. त्यात उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस आणि सपा हे एकत्र आलेले असल्याने काँग्रेसला दिलासा मिळाला आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. उत्तर प्रदेशमधील ज्या १७ जागांवर मित्रपक्ष निवडणूक लढवत आहे, तिथे आपलाच पक्ष मैदानात असल्यासारखं समजून काम करा, अशा सूचना अखिलेश यादव यांनी दिल्या आहेत. दरम्यान, अमेठी आणि रायबरेलीमधील सभांमध्ये लाल टोपी घातलेल्या समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मोठ्या प्रमाणात असलेल्या उपस्थितीमुळे अखिलेश यादव यांच्या आवाहनाचा सकारात्मक परिणाम होताना दिसत आहे.  

यापूर्वी २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी आणि काँग्रेसमध्ये आघाडी झाली होती. मात्र त्यावेळी या आघाडीचा दारुण पराभव झाला होता. मात्र अमेठी आणि रायबरेलीमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांच्या विजयासाठी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्रितपणे प्रयत्न करत आहेत. काँग्रेसने रायबरेली लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी यांना तर अमेठी येथून के. एल. शर्मा यांना उमेदवारी दिली आहे.

अमेठी आणि रायबरेलीमध्ये काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी प्रचार अभियानाचं नेतृत्व आपल्याकडे ठेवलं आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक सभेमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबतच समाजवादी पक्षाचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने दिसत आहेत.

२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवासाठी दोन्ही पक्षांमधील आघाडी ही केवळ कागदावरच राहणे कारणीभूत ठरले होते, असा दावा काही नेत्यांनी केला होता. मात्र सपा आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून यावेळी मात्र वेगळं मत मांडलं जात आहे. सपाचे रायबरेलीमधील जिल्हाप्रमुख वीरेंद्र यादव यांनी सांगितले की, २०१७ मध्ये ऐनवेळी आघाडी झाली होती. त्यामुळे आम्हाला पुरेशी तयारी करता आली नव्हती. मात्र यावेळी इंडिया आघाडी ही सातत्याने बैठका घेत होती. त्यामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि नेत्यांमधील समन्वय वाढला आहे.

अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येती पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात रायबरेली लोकसभा मतदारसंघामध्ये बछरावां, हरचंदपूर, रायबरेली, उंचाहार आणि सरेनी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. तर अमेठी लोकभा मतदारसंघामध्ये तिलोई, सलोन, जगदीशपूर, गौरीगंज आणि अमेठी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या दहा विधानसभा मतदारसंघांपैकी रायबरेलीमधील ४ आणि अमेठीमधील दोन मतदारसंघ हे समाजवादी पक्षाच्या ताब्यात आहेत. तर रायबेलीमधील एक आणि अमेठीमधील तीन मतदारसंघ हे भाजपाच्या ताब्यात आहेत. मात्र येथील समाजवादी पक्षाच्या सहा आमदारांपैकी दोन आमदारांनी हल्लीच भाजपाला पाठिंबा दिला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे काँग्रेसचे बालेकिल्ले समजल्या जाणाऱ्या या दोन्ही मतदारसंघात काँग्रेसचा एकही आमदार निवडून आलेला नाही. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४amethi-pcअमेठीrae-bareli-pcरायबरेलीcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टीAkhilesh Yadavअखिलेश यादवRahul Gandhiराहुल गांधी