शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 16:34 IST

Lok Sabha Election 2024: पहिल्या पाच टप्प्यांमधील मतदानामध्ये. भाजपाने (BJP) ३१० जागांचा टप्पा ओलांडला. आहे. तर काँग्रेसला (Congress) यावेळी ४० जागाही मिळणार नाहीत, असा दावा अमित शाह यांनी केला आहे. पहिल्या पाच टप्प्यांमधील मतदानामधून इंडिया आघाडीचा सफाया झाला आहे, असा टोला अमित शाह (Amit Shah) यांनी लगावला आहे.

अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठीचं पाच टप्प्यातील मतदान आटोपलं असून, आता शेवटच्या दोन टप्प्यातील मतदान शिल्लक आहे. दरम्यान, आतापर्यंत झालेल्या मतदानामधून देशातील वारे कुठल्या दिशेने वाहताहेत याचा अंदाज घेतला जात आहे. वेगवेगळे राजकीय विश्लेषक लोकसभा निवडणुकीतील निकालाबाबत वेगवेगळे दावे करत असताना आता भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपाच्या निवडून येणाऱ्या जागांबाबत मोठं भाकित केलं आहे.  पहिल्या पाच टप्प्यांमधील मतदानामध्ये. भाजपाने ३१० जागांचा टप्पा ओलांडला. आहे. तर काँग्रेसला यावेळी ४० जागाही मिळणार नाहीत, असा दावा अमित शाह यांनी केला आहे. पहिल्या पाच टप्प्यांमधील मतदानामधून इंडिया आघाडीचा सफाया झाला आहे, असा टोला अमित शाह यांनी लगावला आहे.

उत्तर प्रदेशमधील डुमरियागंज येथे भाजपा उमेदवार जगदंबिका पाल यांच्यासाठी आयोजित केलेल्या प्रचारसभेत अमित शाह म्हणाले की, पहिल्या पाच टप्प्यांमधील मतदानामध्ये विरोधी पक्षांच्या आघाडीचा सफाया झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसला ४० जागाही मिळणार नाहीत. तर अखिलेश यादव यांचे चार उमेदवारही जिंकून येणार नाहीत, हे मी तुम्हाला सांगून ठेवतो, असा दावा अमित शाह यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, पीओके भारताचा भाग आहे आणि भाजपा तो परत मिळवेल. पाकिस्तानचे नेते म्हणतात की, पीओके त्यांचा आहे. काँग्रेसचे नेतेही सांगतात की, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. त्यांना मी सांगतो की, भाजपाचे लोक अणुबॉम्बला घाबरत नाहीत. पीओके भारताचा भाग होता, आहे आणि पुढेबी राहील, तसेच आम्ही तो परत मिळवू.  

यावेळी अमित शाह यांनी राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी परदेशात सुट्टीवर जाण्यासाठीची तिटिकं बुक केली आहेत. एकीकडे राहुल गांधी हे इटली, थायलंड आणि बँकॉकसाठी रवाना होतात, तर दुसरीकडे नरेंद्र मोदी यांनी २३ वर्षांमध्ये कधीही सुट्टी घेतलेली नाही. एवढंच नाही तर ते आपली दिवालीसुद्धा सैनिकांसोबत साजरी करतात. भाजपाने निवृत्त सैनिकांसाठी वन रँक वन पेन्शन योजना सुनिश्चित केली. तसेच आता नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळामध्ये भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा दावाही अमित शाह यांनी केला.   

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसAmit Shahअमित शाहUttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४