शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे एकनाथ शिंदेंना दोष देता येणार नाही; अमित ठाकरे राजकीय उलथापालथीवर रोखठोक बोलले!
2
NCP: अजित पवारांकडून आदेशाचे उल्लंघन, शरद पवार गटाने दिले पुरावे; सुप्रीम कोर्टाने दिला इशारा
3
महायुतीच्या बंडखोरांवर अमित शाहांचे लक्ष; शिंदे-फडणवीस-पवारांना दिल्या विशेष सूचना...
4
शरद पवारांचा शब्द उद्धव ठाकरे पाळणार?; सांगोला मतदारसंघावरून हायव्होल्टेज ड्रामा
5
भयंकर! ३ महिने लेकाने घरातच ठेवला आईचा मृतदेह, शेजाऱ्यांना संशय आला अन् झाली पोलखोल
6
ज्या माणसानं 'घड्याळ' बनवलं त्यानं सेल काढून टाकलेत; रोहित पाटील विरोधकांवर कडाडले
7
माजी आमदाराला १०० ग्रॅम हेरॉईन विकताना पकडले; कारने पळताना भाच्याने पोलिसालाही उडविले
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सुनावणी आधीच बदलला राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील बोर्ड; नेमकं कारण काय?
9
पुण्याच्या मैदानात Washington Sundar चा जलवा! न्यूझीलंडचा पहिला डाव २५९ धावांत आटोपला
10
बिग बॉसमधून कधी बाहेर यायचं हे आधीच ठरलं होतं? गुणरत्न सदावर्तेंचा मोठा गौप्यस्फोट
11
उमेदवारी अर्ज दाखल करायला जाताना भुजबळांचं जोरदार शक्तीप्रदर्शन, हाती घेतला भाजपचा झेंडा; म्हणाले...
12
यशस्वी डाव! वॉशिंग्टनची 'सुंदर' गोलंदाजी; चेंडू कसा वळला ते रचिनसह टॉमलाही नाही कळलं (VIDEO)
13
सीएम ओमर अब्दुल्लांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
14
एक आयडिया आणि आई-मुलाची जोडी ठरली सुपरहिट; वर्षाला करतात ५० लाखांची कमाई
15
अखेर ठरलं! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
16
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या तेजीला ब्रेक, १४४२ रुपयांनी स्वस्त झाली चांदी; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
इथे ठाकरे गटाशी युती तोडली, तिथे संभाजी ब्रिगेडचे नेते मनोज जरांगेंच्या भेटीला; चर्चांना उधाण
18
“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
19
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा
20
Ratnagiri Assembly Elections 2024: मशाल पेटणार की, पुन्हा धनुष्यबाण! रत्नागिरीत गणित कसं?

"मला तुरुंगात ठेवलं तर आप प्रचार न करता ७० पैकी ७० जागा जिंकेल’’, अरविंद केजरीवाल यांचा भाजपाला टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 6:36 PM

Lok Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीवेळी मला तुरुंगात ठेवल्यास आम आदमी पक्ष हा कुठलाही प्रचार न करता दिल्लीमधील ७० पैकी ७० जागांवर जिंकून येईल, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला. 

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केली होती. मात्र जवळपास ५२ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता. पण या जामिनाची मुदत आता संपूत असून, सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्याने अरविंद केजरीवाल यांना २ जून रोजी पुन्हा एकदा तुरुंगात जावं लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, दिल्लीमध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभेची निवडणूक होणार असून, त्या निवडणुकीवेळी अरविंद केजरीवाल हे तुरुंगात राहिल्यास आम आदमी पक्षासमोर मोठं आव्हान उभं राहू शकतं. यादरम्यान, विधानसभा निवडणुकीवेळी आपल्याला तुरुंगात ठेवल्यास आम आदमी पक्ष हा कुठलाही प्रचार न करता दिल्लीमधील ७० पैकी ७० जागांवर जिंकून येईल, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला. 

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा न देण्याच्या मुद्द्यावर सांगितलं की, मला कधीही पद किंवा खुर्चीचा मोह नव्हता. जेव्हा मी इन्कम टॅक्स विभागात कमिश्नर होतो. तेव्हा एका दिवसात नोकरीचा राजीनामा देऊन आलो होतो. त्यानंतर झोपडपट्ट्यांमधून काम काम केलं. त्यावेळी पक्ष स्थापन करायचा, निवडणूक लढवायची, अशी कुठलीही योजना नव्हती. पुणे अण्णांचं आंदोलन झालं. त्यानंतर पक्ष स्थापन केला, निवडणूक लढवून मुख्यमंत्री झालो,  मुख्यमंत्री झाल्यानंतर ४९ दिवसांनी स्वत:च्या मूल्यांसाठी मी राजीनामा दिला. तेव्हा माझ्याकडे कुणी राजीनामा मागितला नव्हता. तर मी स्वत: खुर्चीला लाथ मारली होती,असं अरविंद केजरीवाल म्हणाले.   

मात्र आज मी खुर्ची सोडत नाही आहे. कारण हा माझ्या संघर्षाचा भाग आहे. आम आदमी पक्षाला दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत करू शकत नाही हे नरेंद्र मोदींना ठावूक आहे. आम्ही एकदा ६७ तर दुसऱ्यांदा ६२ जागा जिंकल्या. त्यामुळे त्यांनी आता नवा कट रचला. केजरीवाल यांना बनावट केसमध्ये अडचवायचं आणि अटक करायची.0 मत ते राजीनामा देतील आणि सरकार कोसळेल.  मी जर आज राजीनामा दिला, तर हा प्रयोग आणखी काही राज्यांमध्ये केला जाईल. मग पुढचा नंबर ममता बॅनर्जींचा असेल. मग पिनराई विजयन यांचा नंबर लागेल. मग स्टॅलिन रांगेत असतील. त्यामुळे जोपर्यंत जामीन मिळत नाही तोपर्यंत तुरुंगातून सरकार चालवायचं, असं मॉडेल मी उभं केलं तर पुढे कुठल्याही मुख्यमंत्र्याला हात लावायची यांची हिंमत होणार नाही, असा दावा केजरीवाल यांनी केला. 

ते पुढे म्हणाले की, केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवा, अशी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. मात्र  सर्वोच्च न्यायालयाने असा कुठला कायदा नाही, त्यामुळे आम्ही त्यांना हटवू शकत नाही, असे सांगितले.   आता मीच सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. तसेच मी तुरुंगात आहे. मुख्यमंत्री असल्याने मला माझी कर्तव्य पूर्ण करण्यासाठी अधिकार देण्यात यावेत. तसेच तुरुंगात सुविधा देण्यात याव्यात, ज्यामुळे मी जामीन मिळेपर्यंत मुख्यमंत्रिपदाच्या जबाबदाऱ्या पूर्ण करू शकेन, अशी मागणी करणार आहे.

दरम्यान, पुढील दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, जर यांनी मला दिल्लीच्या निवडणुकीवेळी तुरुंगात ठेवलं. तर कुठलाही प्रचार न करता आम आदमी पक्षाच्या ७० पैकी ७० जागा निवडून येतील. तसेच भाजपाला एकही जागा मिळणार नाही. जनता सगळं पाहत आहे. तसेच ती खूप समजूतदार आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाdelhiदिल्ली