शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

आचारसंहिता लागण्यापूर्वी भाजपा करणार मोठी खेळी, २०१९ चा रेकॉर्ड मोडण्यासाठी आखली अशी रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 4:35 PM

Lok sabha Election 2024: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून सलग तिसऱ्यांदा देशाची सत्ता मिळवण्यासाठी भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी भाजपा मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून सलग तिसऱ्यांदा देशाची सत्ता मिळवण्यासाठी भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान, २०१९ च्या तुलनेत भाजपा यावेळी अधिक जागांवर निवडणूक लढवणार आहे. तसेच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी भाजपा मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहे. लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागण्यापूर्वी भाजपा आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा जानेवारी महिन्याच्या अखेरीस किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करू शकतो. भाजपा आपल्या पहिल्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नावांचा समावेश करू शकतो.  

२०१९ मध्येही भाजपाने आपल्या पहिल्या यादीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि राजनाथ सिंह यांची उमेदवारी जाहीर केली होती. भाजपाच्या पहिल्या यादीमध्ये पक्षाने आतापर्यंत कधीही  न जिंकलेल्या आणि २०१९ मध्ये अत्यंत कमी फरकाने जिंकलेल्या १६४ जागांचाही समावेश असेल. गेल्या दोन वर्षांपासून भाजपाकडून अशा जागांवर लक्ष्य केंद्रित करून मेहनत घेतली जात आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ५४३ पैकी ४३६ जागांवर निवडणूक लढवली होती. तसेत त्यापैकी ३०३ जागांवर विजय मिळवला होता. तर १३३ जागांवर भाजपाचा पराभव झाला होता. त्याबरोबरच पक्ष कमकुवत असलेल्या ३१ जागा अशा मिळून १६४ जागांची यादी करून केंद्रीय मंत्री आणि इतर बड्या नेत्यांकडे या जागांची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ही जबाबदारी घेतलेल्या नेत्यांमध्ये अमित शाह यांचाही समावेश आहे.

भाजपाने या जागांना सी आणि डी गटात विभागलं आहे. त्यात प्रत्येकी ८० जागांच्या दोन श्रेणी बनवण्यात आल्या आहेत. ४५ मंत्र्यांकडे या जागांची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक मंत्र्याकडे दोन किंवा तीन जागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपा यावेळी अधिक जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मागच्या पाच वर्षांमध्ये काही बड्या मित्रपक्षांनी भाजपाची सोडलेली साथ हे  त्यामागचं महत्त्वाचं कारणं  आहे.

भाजपा २०१९ मध्ये पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल, बिहारमध्ये जेडीयू, महाराष्ट्रामध्ये शिवसेना, तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक या पक्षांना सोबत घेऊन लढला होता. मात्र आता या मित्रपक्षांनी भाजपाची साथ सोडली आहे. त्यामुळे या राज्यांत भाजपाला अधिकाधिक जागा लढता येतील. २०१९ मध्ये भाजपाने पंजाबमधील १३ पैकी ३, महाराष्ट्रात ४८ पैकी २५, बिहारमध्ये ४० पैकी १७ तर तामिळनाडूमध्ये ३९ पैकी ५ जागांवर निवडणूक लढवली होती. 

टॅग्स :BJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक