शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 11:06 IST

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचारसभा सुरू आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा दिल्लीत प्रचारासाठी आले आहेत.

Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकांची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचारसभा सुरू आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा दिल्लीत प्रचारासाठी आले आहेत. यावेळी त्यांनी सभेत मोठं विधान केलं आहे. "भाजपला ४०० जागा मिळाल्यास वाराणसीमध्ये ज्ञानवापी आणि कृष्णजन्मभूमी मंदिरे बांधली जातील, असं विधान मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा  यांनी केलं आहे. यावेळी ४०० ओलांडली म्हणजे ज्ञानवापी येथील शिवालय, मथुरा येथील श्री कृष्ण मंदिर आणि पाकव्याप्त काश्मीर भारतात परत येईल, असंही ते म्हणाले. 

भाजप उमेदवार हर्ष मल्होत्रा ​​यांच्या प्रचारासाठी हिमंता बिस्वा सरमा दिल्लीत आले होते. येथील लक्ष्मीनगर येथील निवडणूक सभेला संबोधित करताना त्यांनी भाजप सरकार आरक्षणाला अधिक बळ देण्याचे काम करत असल्याचा दावाही केला.

Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"

'गेल्या निवडणुकीत आम्ही सांगितले होते की राम मंदिर बनवायचे आहे आणि यावेळी निवडणुकीत आम्ही तुमच्यामध्ये आलो तेव्हा राम मंदिर बांधले आहे. त्यामुळे आता विजयही मोठा झाला पाहिजे, कारण आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत, असंही मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले. 

ज्यावेळी काँग्रेस आम्हाला ४०० पेक्षा जास्त जागा कशासाठी हवेत असं विचारते, तेव्हा आम्हाला वाटले की त्याचे उत्तर असायला हवे. तेव्हा मी म्हणतो, आमच्याकडे ३०० जागा होत्या तेव्हा आम्ही राम मंदिर बांधले. जर आपल्याला ४०० जग मिळाल्या तर मथुरामध्ये श्री कृष्णाचे जन्मस्थान असेल. आणि ज्ञानवापी मशि‍दीच्या जागी बाबा विश्वनाथ यांचे भव्य मंदिर बांधण्यात येणार आहे, असंही सरमा म्हणाले. 

देशाची राजधानी दिल्लीतील लोकसभेच्या ७ जागांसाठी २५ मे रोजी मतदान होणार आहे. मतदानापूर्वी भाजपने आपली सर्व ताकद दिल्लीत लावली आहे. भाजपचे बडे नेते दिल्लीत आहेत.

टॅग्स :BJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक