शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
3
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
4
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
5
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
6
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
7
'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
8
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
9
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
10
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
11
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
12
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
13
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
14
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
15
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
16
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
17
Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
18
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
19
"पहिल्या सीझनला मला स्पर्धक म्हणून ऑफर होती", केदार शिंदेंचा खुलासा; म्हणाले, 'शो स्क्रीप्टेड...'
20
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर

 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 6:08 PM

Lok Sabha Election 2024: मे महिन्याच्या अखेरच्या दिवसांमध्ये मान्सूनची चाहूल लागली असली तरी देशातील बहुतांश भागात कडक उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरत असलेल्या कार्यकर्त्यांसह मोठमोठ्या नेते मंडळींचीही दमछाक होत आहे. असंच चित्र आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या प्रचारसभेमध्ये दिसलं.

मे महिन्याच्या अखेरच्या दिवसांमध्ये मान्सूनची चाहूल लागली असली तरी देशातील बहुतांश भागात कडक उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी फिरत असलेल्या कार्यकर्त्यांसह मोठमोठ्या नेते मंडळींचीही दमछाक होत आहे. असंच चित्र आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या प्रचारसभेमध्ये दिसलं. प्रचारसभेत भाषण करत असताना उकाडा सहन न झाल्याने राहुल गांधी यांनी भरसभेत पाण्याची बाटली डोक्यावर ओतून उकाड्यापासून दिलासा मिळवण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी हे उत्तर प्रदेशमधील देवरिया येथे प्रचारसभेसाठी आले असताना ही घटना घडली. तिथे भाषण देत असताना खूप गरमी आहे, असं राहुल गांधी म्हणाले. त्यानंतर त्यांनी पाण्याची संपूर्ण बाटली डोक्यावर रिकामी केली. 

सध्या देशातील काही राज्यांत भीषण उन्हाळा सुरू आहे. तर  सर्व नेते हे लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारात गुंतले आहेत. मात्र भीषण उन्हाळ्यामुळे त्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या सरासरी तापमानापेक्षा ८ डिग्री अधिक तापमानाची नोंद होत आहे. तसेच काँग्रेसचे नेते राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेते उकाड्यापासून वाचण्याचा सल्ला लोकांना देत आहेत.  

दरम्यान, उकाड्याने हैराण झाल्यानंतरही राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांच्या परमात्मा विधानावरून घणाघाती टीका केली.  त्यांनी सांगितले की, इतर सर्व जण बायोलॉजिकल आहेत. मात्र नरेंद मोदी हे बायोलॉजिकल नाही आहेत. त्यांना त्यांच्या परमात्माने अंबानी आणि अदानी यांची मदत करण्यासाठी पाठवलं आहे. मात्र परमात्माने त्यांना शेतकरी आणि मजुरांची मदत करण्यासाठी पाठवलेलं नाही.  

राहुल गांधी म्हणाले की, जर परमात्म्याने असं केलं असतं तर त्यांनी गरीब आणि शेतकऱ्यांची मदत केली असती. यावेळी राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांवरही टीका केली. ते म्हणाले की, हे नरेंद्र मोदीवाले परमात्मा आहेत. काही चमचे मोदींसोबत बसून त्यांना प्रश्न विचारतात. तुम्ही आंबा कसा खाता, धुवून खाता की सोलून खाता, असले प्रश्न विचारतात. त्यावर मोदी मी काही करत नाही, सारं आपोआप होतं, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.

जर मोदींना परमात्म्याने मोदींना पाठवले असते तर परमात्म्याने त्यांना देशातील सर्वात गरीब लोकांची मदत करा, असे सांगितले असते, शेतकऱ्यांची मदत करा, असे सांगितले असते. मात्र मोदींच्या परमात्म्याने त्यांना अंबानींची मदत करा, अदानींची मदत करा, असे सांगितले. अंबानी-अदानीचे १६ लाख कोटी माफ करा, असे सांगितले. हे कसले परमात्मा आहेत, असा सवाल राहुल गांधी यांनी केला.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीcongressकाँग्रेसweatherहवामानUttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४