शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 17:50 IST

Lok Sabha Election 2024 : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. जर नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर देशातील परिस्थिती निराशाजनक असती असं म्हणत निशाणा साधला आहे. राज्याच्या बारपेटा येथील निवडणूक रॅलीदरम्यान आसामच्या मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं आहे.

'इंडिया टुडे' या इंग्रजी वेबसाइटच्या वृत्तानुसार, हिमंता बिस्वा सरमा यांनी रॅलीला संबोधित करताना मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात केलेल्या विकासकामांचा उल्लेख केला. सरमा यांनी कोरोना व्हायरसच्या साथीच्या काळात लसी आणि औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या केंद्र सरकारच्या भूमिकेचे कौतुक केलं. नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व नसते तर देशातील परिस्थिती गंभीर होऊ शकली असती असं म्हटलं आहे. 

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी उचललेल्या पावलांसाठी मोदी सरकारचं भरभरून कौतुक केलं. 2014 नंतर बोडो आणि कार्बी आंदोलनांमध्ये घट झाली, त्यामुळे प्रादेशिक मुद्द्यांमध्ये प्रगती झाली. याचे श्रेय केंद्रीय नेतृत्व आणि मोदी सरकारला जाते. महिला बचत गटांना जिओ टॅगिंगचे काम सोपवण्याची योजना त्यांना अधिक सक्षम करेल असं देखील सांगितलं आहे. 

चार जागांसाठी होणार मतदान 

आसाममध्ये लोकसभेच्या एकूण 14 जागा आहेत. पहिल्या दोन टप्प्यात 10 जागांवर मतदान झाले आहे. उर्वरित चार जागांसाठी तिसऱ्या टप्प्यात सात मे 2024 रोजी मतदान होणार आहे. त्यात गुवाहाटी, बारपेट, कोक्राझार आणि धुबरी या जागा आहेत. 2019 च्या निवडणुकीत आसाममध्ये भाजपाने नऊ जागा जिंकल्या होत्या.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधी