शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 20:42 IST

Lok Sabha Election 2024: अज्ञान, आळस आणि अहंकार ह्या  काँग्रेसच्या (Congress) तीन मुख्य समस्या असल्याचे महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी काँग्रेसच्या वर्मावर बोट ठेवले आहे. सोबतच राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आता काही काळ राजकारणातून ब्रेक घ्यावा,असा सल्लाही दिला आहे. 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील मित्रपक्षांसह सत्ताधारी भाजपाला कडवी टक्कर देताना दिसत आहे. मात्र प्रख्यात राजकीय विश्लेषक आणि रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सत्तांतर होण्याची शक्यता नसल्याचे म्हटले आहे. तसेच अज्ञान, आळस आणि अहंकार ह्या  काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या असल्याचे महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत प्रशांत किशोर यांनी काँग्रेसच्या वर्मावर बोट ठेवले आहे. सोबतच राहुल गांधी यांनी आता काही काळ राजकारणातून ब्रेक घ्यावा,असा सल्लाही दिला आहे. 

सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसचं भविष्य आणि सुधारणेसाठीच्या संभाव्य मार्गांबाबत विचारण्यात आले असता प्रशांत किशोर म्हणाले की, जेव्हा आपल्यामध्ये काही तरी उणीव आहे आणि सुधारणेची गरज आहे, अशी जेव्हा एखाद्याला जाणीव होते, तेव्हाच सुधारणा होऊ शकते. सद्यस्थितीत काँग्रेसमध्ये मानसिक अज्ञान, बौद्धिक आळ आणि अहंकार भरलेला आहे. तसेच पक्ष अजूनही याच पद्धतीने मार्गाक्रमण करत आहे. 

याबाबत सविस्तरपणे बोलताना प्रशांत किशोर यांनी सांगितलं की, हे असं आहे की, आपण योग्य मार्गावर आहोत, असं एखाद्याला वाटतं, मात्र ते काय करत आहेत हेच त्यांना बऱ्याचदा समजत नाही. काँग्रेसच्या सद्यस्थितीमागे आणखी एक शक्यता आहे ती म्हणजे भारतीय राजकारणात सध्या काय चाललंय आणि त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी काय करण्याची आवश्यक आहे, हेच त्यांना माहिती नाही आहे, असं परखड मत प्रशांत किशोर यांनी मांडलं. 

ते पुढे म्हणाले की, काँग्रेसमध्ये अज्ञानता, आळस आणि अहंकार यांचं एकत्रिकरण झालं आहे.  लोक त्यांना मत का देत नाही आहेत, हेच काँग्रेसला कळत नाही आहे. दुसरी बाब म्हणजे काँग्रेसला काँग्रेसला हे समजत आहे मात्र ते एवढे आळशी आहेत की ते सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. तर तिसरी बाब म्हणजे काँग्रेसमधील अहंकार असू शकतो. त्यामुळे लोक सध्या आपल्याला मतदान करत नसतील, तरी कधी ना कधी लोकांना आपल्या चुकीची जाणीव होईल आणि शेवटी ते काँग्रेसला मतदान करतील, असं काँग्रेसला वाटत आहे, अशी टीका प्रशांत किशोर यांनी केला.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीPrashant Kishoreप्रशांत किशोर