शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Mamata Banerjee : "देशाला जेल बनवताहेत, एका खिशात CBI, ED अन् दुसऱ्या...."; ममता बॅनर्जींचं भाजपावर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 11:49 IST

Lok Sabha Elections 2024 Mamata Banerjee And Narendra Modi : ममता बॅनर्जी यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. देश आणि लोकशाहीला जेलमध्ये बदलण्याचं काम करत असल्याचं म्हणत निशाणा साधला आहे. ईडी आणि सीबीआय यांसारख्या एजन्सी सरकारच्या खिशात असल्याचा दावा ममतांनी केला. पक्षाच्या नेत्यांना अटक झाल्यास त्यांच्या पत्नी रस्त्यावर उतरतील, असा इशारा तृणमूल प्रमुख ममता बॅनर्जी यांनी दिला.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे आले आणि म्हणाले की, 4 जूननंतर भ्रष्टाचारावर कठोर कारवाई केली जाईल. पण, निवडणुकीनंतर विरोधी पक्षनेत्यांना तुरुंगात पाठवायचे, असा त्यांचा अर्थ आहे. पंतप्रधानांनी असं बोललं पाहिजे का? निवडणुकीनंतर भाजपाच्या नेत्यांना तुरुंगात टाकलं जाईल, असं जर मी म्हणाले तर..., पण मी असं म्हणणार नाही, कारण लोकशाहीत अशा गोष्टी मान्य नाहीत.

ईडी-सीबीआयवरून भाजपावर टीकास्त्र

पश्चिम बंगालमधील बांकुरा येथे लोकांना संबोधित करताना ममता यांनी भाजपा संपूर्ण देशाला तुरुंगात बदलत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी अटक केलेल्या टीएमसी नेत्यांच्या पत्नींना त्यांच्या पतीच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरण्यास सांगितलं. "लोकांना निवडकपणे अटक केली जात आहे. प्रत्येकाला तुरुंगात पाठवले जात आहे. भाजपा देश आणि लोकशाहीला जेलमध्ये बदलत आहे."

"भाजपा आम्हाला धमकावू शकत नाही"

"तुमच्या एका खिशात ईडी आणि सीबीआय आहे, तर दुसऱ्या खिशात एनआयए आणि आयकर विभाग आहे. एनआयए-सीबीआय भाजपाचे भाऊ आहेत, तर ईडी आणि आयकर हे भाजपाचे टॅक्स कलेक्शन फंडींग बॉक्स आहेत. तपास करणाऱ्या एजन्सी तुमचे सहकारी आहेत, त्या आम्हाला धमक्या देण्याचा प्रयत्न करत आहेत, पण भाजपा आम्हाला धमकावू शकत नाही" असं ममता यांनी म्हटलं आहे. 

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरूनही ममतांनी केंद्रावर निशाणा साधला. "तुम्ही हेमंत सोरेन यांना अटक का केली? मी त्यांच्या पत्नीशी बोलले आहे. अरविंद केजरीवाल यांना अटक का करण्यात आली? आता त्यांना तुरुंगातून काम करावं लागत आहे. त्यांच्या अटकेने काही फरक पडणार नाही, कारण ते मोठ्या मताधिक्याने निवडणूक जिंकतील" असं देखील ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीTrinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४