शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

'कान उघडून ऐका, मोदी जिवंत असेपर्यंत...', OBC आरक्षणावरुन PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 15:49 IST

Lok sabha Election 2024: 'काँग्रेस असा पक्ष आहे, जो पदोपदी बाबासाहेबांचा अपमान करतो, राज्यघटनेचा अपमान करतो आणि सामाजिक न्यायालाही नष्ट करण्याचा प्रयत्न करतो.'

UP Lok sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी(दि.26) उत्तर प्रदेशातील आठ जागांवर मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर जोरदार निशाणा साधला. संविधान धोक्यात असल्याच्या INDIA आघाडीच्या आरोपांना पंतप्रधानांनी चोख प्रत्युत्तर दिले. संविधान निर्माण करणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेस पदोपदी अपमान करत असल्याची टीका पंतप्रधानांनी केली.

आग्रा येथे जाहीर सभेत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेस असा पक्ष आहे, जो पदोपदी बाबासाहेबांचा अपमान करतो, राज्यघटनेचा अपमान करतो आणि सामाजिक न्यायालाही नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. त्याच काँग्रेसने कधी कर्नाटकात, कधी आंध्र प्रदेशात आपल्या जाहीरनाम्यात धर्माच्या आधारावर आरक्षणाचा पुरस्कार केला. सपा-काँग्रेसची आघाडी तर तुष्टीकरणात गुंतलेली आहे. 2024 च्या निवडणुकीसाठी काँग्रेसने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यावर 100% मुस्लिम लीगची छाप दिसते. काँग्रेसचा संपूर्ण जाहीरनामा फक्त व्होट बँक मजबूत करण्यासाठी आहे. तर, भाजपचा जाहीरनामा देशाला बळकट करण्यासाठी आहे. काँग्रेस-सपाची मैत्री तुष्टीकरणाच्या राजकारणावर आधारित आहे. 

हे तुष्टीकरणाचे राजकारण पंतप्रधान पुढे म्हणाले, हे दोघे मिळून आपल्या भाषणात ओबीसींबद्दल बोलतात आणि आपली व्होट बँक मजबूत करण्यासाठी मागच्या दाराने ओबीसींचे हक्क हिसकावून घेऊ इच्छितात. आता काँग्रेसने धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 27% OBC कोट्यापैकी काही भाग चोरून, हिसकावून आरक्षण द्यावे, असा मार्ग काँग्रेसने शोधला आहे. पण, आमचा मार्ग तुष्टीकरणाचा नसून, समाधानाचा आहे. सबका साथ, सबका विकास हा आमचा मंत्र आहे. आमचे विचार असे आहेत की, कोणतीही सरकारी योजना असो, त्याचा लाभ सर्व जादी-धर्मातील लोकांना मिळायला हवा. कोणताही भेदभाव न करता, कोणत्याही प्रकारची वैयक्तिक बाब न ठेवता, लाच न घेता प्रत्येकाचे हक्क मिळायला हवा, हाच खरा सामाजिक न्याय असतो.

काही लोकांना भारताची वाढती शक्ती आवडत नाहीकाही लोकांना भारताची वाढती शक्ती आवडत नाही. आता देशात संरक्षण कॉरिडॉर तयार होत आहे, सैन्य स्वावलंबी होत आहे. भारत जगाला शस्त्रे निर्यात करत आहे. जगभर असे अनेक  शस्त्र दलाल आहेत, ज्यांना जुन्या सरकारप्रमाणे मलाई खायला मिळत नाही. असे सर्व लोक आता अस्वस्थ आणि खूप संतापले आहेत. भारतीय लष्कराने स्वावलंबी व्हावे असे त्यांना वाटत नाही, त्यामुळेच ते मोदींविरोधात एकवटले आहेत. या शक्तींना रोखण्यासाठी, देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी, देशाच्या सुरक्षेसाठी पुन्हा एकदा भाजप आणि एनडीएचे सरकार आणणे अत्यंत आवश्यक आहे, अशी टीकाही पीएम मोदींनी यावेळी केली.

टॅग्स :Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४Uttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाCongoकाँगोNarendra Modiनरेंद्र मोदी