शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

राहुल आणि प्रियंका गांधी या मतदारसंघातून लढवणार लोकसभा निवडणूक, UP-बिहारमधील ४० जागांवर काँग्रेसचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 4:55 PM

Lok Sabha Election 2024: उत्तर प्रदेश आणि बिहारमधील किमान ३० ते ४० जागांवर काँग्रेसकडून दावेदारी ठोकण्यात आली आहे. तसेच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे मतदारसंघही काँग्रेसकडून निश्चित करण्यात आले आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये इंडिया आघाडीमध्ये होणाऱ्या जागावाटपाला आता नवं वळण लागण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील किमान ३० ते ४० जागांवर काँग्रेसकडून दावेदारी ठोकण्यात आली आहे. तसेच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे मतदारसंघही काँग्रेसकडून निश्चित करण्यात आले आहेत. राहुल गांधी रायबरेली येथून तर प्रियंका गांधी अमेठी येथून स्मृती इराणी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. येत्या एक दोन दिवसांमध्याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, बिहारमधील सुमारे १५ ते २० जागांवर काँग्रेसकडून महाआघाडीमध्ये दावेदारी करण्यात आली आहे. या जागांवर तारिक अन्वर, अखिलेश प्रसाद सिंह, कन्हैया कुमार, शकील अहमद खान आणि राज्यसभा खासदार रंजीत रंजन या नेत्यांना लढवलं जाण्याची शक्यता आहे. 

इंडिया आघाडीतील बदलत्या समिकरणांदरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेस नेत्यांनी जागावाटपाबाबत नव्याने चर्चा सुरू केली आहे.  उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अनुक्रमे आरएलडी आणि जेडीयूने साथ सोडल्यानंतर कांग्रेसला अधिका जागा मिळाल्या पाहिजेत, असा काँग्रेस नेत्यांचा आग्रह आहे. दरम्यान, काँग्रेसने समाजवादी पक्षाकडे आपल्या २० उमेदवारांच्या नावांची यादी सोपवली आहे, असे काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसने उत्तर प्रदेशमधील अमेठी, राय बरेली, कानपूर, बलिया, बाराबंकी, मेरठ, महाराजगंज, रामपूर, सहारनपूर, झाशी, फतेहपूर सिक्री, जालौन, बासगांव आणि बिजनौरसारख्या जागांवर दावा केला आहे. जागावाटपाबाबत राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. सध्या केवळ ५ ते ६ जागांवरच  सहमती बनली आहे. मात्र काँग्रेस आणि सपामध्ये १५ ते २० जागांवर एकमत होईल, असं बोललं जात आहे.

त्याचप्रमाणे भाजपाने बिहारमध्येही १५ ते २० जागांवर दावेदारी केली आहे. काँग्रेसकडून सुपौल, सासाराम, समस्तीपूर, मधुबनी, दरभंगा, बेगुसराय, पूर्ण चंपारण्य, पटना साहिब, झंझारपूर, किशनगंज, औरंगाबाद, गोपालगंज, कटिहार आमि अररिया या जागांसाठी काँग्रेस आणि आरजेडीमध्ये चर्चा सुरू आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेशRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधी