शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
7
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
8
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
9
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
10
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
11
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
12
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
13
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
14
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
15
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
16
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
17
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
18
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
20
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'

Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 15:04 IST

Lok Sabha Election 2024 Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपाने निवडणूक जिंकली तर ते संविधान बदलतील असं म्हटलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपाने निवडणूक जिंकली तर ते संविधान बदलतील असं म्हटलं आहे. मध्य प्रदेशातील रतलाम येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, भाजपा नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, निवडणुकीत जिंकलो तर संविधान बदलू, त्यामुळेच त्यांनी 400 जागांचा नारा दिला होता. भाजपा-एनडीएला 150 जागाही मिळणार नसल्याचा दावा राहुल यांनी केला.

ही निवडणूक देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्याची निवडणूक असल्याचं राहुल म्हणाले. "एका बाजूला नरेंद्र मोदी आणि आरएसएस आहेत, जे संविधान नष्ट करू पाहत आहेत. दुसरीकडे, काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी आहे, जी संविधान वाचवण्यात मग्न आहे. भाजपाच्या लोकांना संविधान रद्द करून गरीब, दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांचे आरक्षण हिसकावून घ्यायचे आहे, मात्र आम्ही आरक्षण कधीच संपू देणार नाही, आरक्षणावरील 50 टक्के मर्यादाही आम्ही हटवणार आहोत" असं राहुल गांधी यांनी सांगितलं आहे. 

राहुल गांधी यांनी हातात संविधान घेऊन लोकांना सांगितलं की, "पंतप्रधान मोदींना हे (संविधान) काढून टाकायचं आहे आणि त्यांना फक्त राज्य करायचं आहे. त्यांना तुमचे सर्व अधिकार काढून घ्यायचे आहेत. हे त्यांचे ध्येय आहे आणि आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करत आहोत. आदिवासी, मागासवर्गीय आणि दलितांना जे काही अधिकार मिळाले ते याचे (संविधान) योगदान आहे."

"भाजपाच्या नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, सत्तेत आल्यास ते हे बाजूला ठेवतील. त्यामुळेच त्यांनी 400 जागांचा नारा दिला आहे. त्यांना 150 जागाही मिळणार नाहीत. त्यांचे नेते सांगत आहेत. ते आरक्षण काढून घेतील, आम्ही दलित, मागासवर्गीय आणि गरिबांना जितकं आरक्षण हवंय ते देऊ" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा