शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

"ज्यांनी रामाच्या भक्तीचा संकल्प केला ते सत्तेत आणि विरोध करणारे…’’, RSS नेते इंद्रेश कुमार यांचा यूटर्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 06:05 IST

Indresh Kumar News: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालांवरून (Lok Sabha Election 2024 Result ) भाजपावर केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात बरीच चर्चा होत आहे. या विधानाच्या माध्यमातून इंद्रेश कुमार आणि संघाने (RSS) भाजपाचे कान टोचल्याचे बोलले जात होते. मात्र आता इंद्रेश कुमार यांनी या विधानापासून पूर्ण यूटर्न घेतला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालांवरून भाजपावर केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात बरीच चर्चा होत आहे. या विधानाच्या माध्यमातून इंद्रेश कुमार आणि संघाने भाजपाचे कान टोचल्याचे बोलले जात होते. मात्र आता इंद्रेश कुमार यांनी या विधानापासून पूर्ण यूटर्न घेतला आहे. ज्यांनी रामाच्या भक्तीचा संकल्प केला ते सत्तेत आणि विरोध करणारे सत्तेबाहेर बसले आहेत, असं विधान इंद्रेश कुमार यांनी केलं आहे. याआधीच्या वक्तव्यावरून खूप वाद झाल्यानंतर इंद्रेश कुमार म्हणाले की, सध्या देशातील वातावरण खूप स्पष्ट आहे. ज्यांनी रामाला विरोध केला ते सत्तेबाहेर आहेत आणि ज्यांनी राम भक्तीचा संकल्प केला ते आज सत्तेत आहेत. तसेच तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झालं आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश चौफेर प्रगती करेल, असा विश्वास जनमानसामध्ये निर्माण झालेला आहे. तसेच हा विश्वास असाच वृद्धिंगत व्हावा, अशा आम्ही शुभेच्छा देतो.दरम्यान, १३ जून रोजी कानोता येथे राम रथ अयोध्या यात्रा दर्शन पूजा समारंभाला संबोधिक करताना इंद्रेश कुमार भाजपाबाबत म्हणाले होते की,  ज्या पक्षाने श्री रामाची भक्ती केली, मात्र ते अहंकारी झाले. त्यांना २४१ वर रोखलं गेलं. मात्र त्यांना सर्वात मोठा पक्ष बनवण्यात आलं. त्यांना जो पूर्ण हक्क मिळाला पाहिजे होता. जी शक्ती मिळायला हवी होती, ती देवाने अहंकारामुळे दिली नाही. तर ज्यांची श्री रामावर कुठल्याही प्रकारची श्रद्धा नव्हती. त्यांना एकत्रितपणे २३४ जागांवर रोखले. सगळे एकत्र मिळूनही पहिलं स्थान मिळवू शकले नाहीत. दुसऱ्या स्थानावरच त्यांना समाधान मानावे लागले. त्यामुळे देवाचा न्याच विचित्र नाही आहे, तर सत्य आहे, खूप आनंददायी आहे, असे इंद्रेश कुमार यांनी सांगितले होते. दरम्यान, काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी इंद्रेश कुमार यांच्या वक्तव्यावरून भाजपाला टोला लगावला होता. ते म्हणाले की, इंद्रेश कुमार हे संघाचे बडे नेते आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही अहंकार आणि मणिपूरवरून भाष्य केलं होतं. भाजपाचे दोन बडे नेते अहंकारी झाले आहेत. आरएसएस आपल्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही. या लोकांना १० वर्षांमध्ये का रोखण्यात आलं नाही. संघाच्या नेत्यांनी निवडणुकीपूर्वी ही विधानं का केली नाहीत, असा सवालही तिवारी यांनी उपस्थित केला.  

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी