शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

हॅटट्रिकसाठी बाबांना जिंकवायचंय! नेत्यांची मुले प्रचारात उतरली, मतदारांकडे मागतायेत मते

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 07:55 IST

राजनाथ सिंह, कौशल किशाेर यांच्यासह विराेधकांची मुले-मुलीही मागतात मते, इतर उमेदवारांचीही मुले-मुली भीषण गरमीतही घराेघरी जाऊन वडिलांसाठी मते मागत आहेत.

राजेंद्र कुमारलखनाै : उत्तर प्रदेशातील राजकारणात लखनाै आणि माेहनलालगंज या मतदारसंघाचे खास वैशिष्ट्य आहे. लखनाैमधून २०१४ पासून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सलग दाेनदा जिंकले आहेत. आता ते हॅटट्रिक करणार का? याकडे लक्ष लागले आहे. त्याचवेळी माेहनलालगंज येथून भाजपने काैशल किशाेर यांना उमेदवारी दिली आहे. तेदेखील २०१४ पासून दाेन वेळा जिंकले आहेत. या दाेघांच्याही प्रचारासाठी त्यांच्या मुलांनी प्रचारात स्वत:ला झाेकून दिले आहे. एवढेच नव्हे तर, दाेन्ही नेत्यांच्या विराेधात उतरलेल्या उमेदवारांची मुले-मुली देखील बाबांसाठी घाम गाळत आहेत.

दाेन्ही जागा देशातील हायप्राेफाईल मतदारसंघात गणल्या जातात. राजनाथ सिंह यांच्यासाठी त्यांची दाेन्ही मुले पंकज आणि नीरज प्रचार करत असून, नुक्कड सभा, बैठकांमध्ये रणनीती आखत आहेत. माेहनलालगंजमध्ये विकास आणि प्रभात हे दाेघेही बाबा काैशल किशाेर यांच्यासाठी बूथ अध्यक्ष, मंडल, पन्ना प्रमुखांसाेबत बैठका करत आहेत. नुक्कड सभांमधूनही ते मतदारांसमाेर जात आहेत. 

मुलीही वडिलांच्या प्रचारातबसपाचे उमेदवार सरवर मलिक यांच्या दाेन मुली नाैशीन आणि उरूज यांनी वडिलांच्या प्रचाराची धुरा सांभाळली आहे. विविध भागात महिलांसाेबत बैठकांमध्ये सहभागी हाेत असून वडिलांसाठी मते मागत आहेत.

प्रचारासाेबत बाबांच्या औषधांकडेही लक्षइतर उमेदवारांचीही मुले-मुली भीषण गरमीतही घराेघरी जाऊन वडिलांसाठी मते मागत आहेत. राजनाथ सिंह यांच्याविराेधात लढणारे सपाचे उमेदवार रविदास मल्हाेत्रा यांचे पुत्र शिवम हे सकाळी १० वाजताच घराबाहेर पडून बाबांसाठी प्रचाराला सुरूवात करतात. दरराेज ते सुमारे १० तास प्रचार करतात. त्याचवेळी ते वडिलांची औषधे तसेच जेवणाकडेही लक्ष ठेवतात. 

मुख्यमंत्री म्हणतात, माेदींसारखा नेता पाकिस्तानलाही हवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा नेता आम्हालाही मिळायला हवा, अशी पाकिस्तानातील राजकारण्यांचीही इच्छा आहे, असे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी एका प्रचारसभेत सांगितले. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्यासारखा नेता पाकिस्तानात हवा होता अशी इच्छा त्या देशाचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनीही व्यक्त केली होती. मोहन यादव यांनी सांगितले की, काँग्रेसनेच भारतात दुहीची बीजे पेरली. त्यामुळेच देशाची फाळणी झाल्याची टीका त्यांनी केली.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपा