शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

मतदानाच्या सप्तपदीतील शेवटची फेरी आज; ८ राज्यांत ५७ जागांवर दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 09:03 IST

या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र माेदी, रविशंकर प्रसाद, अनुराग ठाकूर, कंगना राणाैत, रवी किशन या भाजपच्या नेत्यांसह राज बब्बर, हरसिमरत काैर बादल आदी विराेधी पक्षांचे नेते रिंगणात आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : लाेकसभा निवडणुकीचा सातवा आणि अखेरचा टप्पा शनिवारी (दि. १ जून) पार पडणार आहे. या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र माेदी, रविशंकर प्रसाद, अनुराग ठाकूर, कंगना राणाैत, रवी किशन या भाजपच्या नेत्यांसह राज बब्बर, हरसिमरत काैर बादल आदी विराेधी पक्षांचे नेते रिंगणात आहेत. यावेळीची निवडणूक प्रामुख्याने भाजपच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’ आणि ‘इंडिया’ आघाडी यांच्यात झाली.

उत्तर प्रदेशात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि इंडिया आघाडीतील सदस्य समाजवादी पार्टी, काँग्रेस यांच्यात थेट लढत होत आहे. तृणमूल काँग्रेसचा गड असलेल्या दक्षिण बंगालमध्ये ‘जुने विरुद्ध नवीन’ सत्तासंघर्ष दिसून येणार आहे. पंजाबमध्ये भाजप आणि शिरोमणी अकाली दल १९९६ नंतर प्रथमच स्वबळावर निवडणूक लढवत आहेत, तर इंडिया आघाडीतील दोन पक्ष काँग्रेस आणि आप यांनी स्वतःचे उमेदवार उभे केले आहेत.

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

  • नरेंद्र माेदी - भाजप - वाराणसी - उत्तर प्रदेश
  • रविशंकर प्रसाद - पक्ष : भाजप - पाटणा साहिब - राज्य : बिहार
  • अनुराग ठाकूर - भाजप - हमीरपूर - हिमाचल प्रदेश
  • अभिषेक बॅनर्जी - तृणमूल काँग्रेस - डायमंड हार्बर - प. बंगाल
  • रवि किशन - भाजप - गाेरखपूर - उत्तर प्रदेश
  • कंगना रणौत - भाजप - मंडी - हिमाचल प्रदेश

सायंकाळी साडेसहानंतर येणार ‘एक्झिट पोल’निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, दूरचित्रवाणी वाहिन्या आणि वेबसाईट १ जून रोजी संध्याकाळी ६:३० नंतर ‘एक्झिट पोल’ची आकडेवारी प्रसिद्ध करू शकतील. 

  • काेणी किती जागा लढविल्या?

भाजप     ४४१काँग्रेस     ३१८सपा     ६२तृणमूल काँग्रेस     ४७आरजेडी     २४डीएमके     २१उद्धवसेना     २१

२५ निवडणूक कर्मचाऱ्यांचा मृत्यू

वाराणसी/पाटणा : उत्तर भारतातील तीव्र उष्णतेच्या लाटेदरम्यान युपी आणि बिहारमध्ये २५ निवडणूक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यात उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे १३, साेनभद्र येथे २ तर बिहारमधील भाेजपूर येथे ५, राेहतास येथे ३ आणि कैमूर व औरंगाबादमध्ये प्रत्येक एक कर्मचारी दगावला. या सर्वांना तीव्र ताप, उच्च रक्तदाब आणि वाढलेली रक्त शर्करा अशी लक्षणे हाेती. बिहारमध्ये गेल्या दाेन दिवसांत २४ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीKangana Ranautकंगना राणौतRavi Kishanरवी किशनvaranasi-pcवाराणसी