शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

भाजपाने उमेदवारी नाकारली, लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत वरुण गांधींनी घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 14:28 IST

Varun Gandhi, Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करताना भाजपाने काही धक्कादायक निर्णय घेतले आहेत. गेल्या काही काळापासून भाजपा आणि केंद्रीय नेतृत्वाविरोधात भूमिका घेणारे खासदार वरुण गांधी यांनाही उमेदवारी न देण्याचा निर्णय भाजपाने घेतला होता.

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करताना भाजपाने काही धक्कादायक निर्णय घेतले आहेत. गेल्या काही काळापासून भाजपा आणि केंद्रीय नेतृत्वाविरोधात भूमिका घेणारे खासदार वरुण गांधी यांनाही उमेदवारी न देण्याचा निर्णय भाजपाने घेतला होता. दरम्यान, उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर वरुण गांधी हे कुठल्या तरी पक्षात दाखल होतील किंवा अपक्ष निवडणूक लढवतील, असे दावे करण्यात येत होते. मात्र लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत वरुण गांधी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. वरुण गांधी हे लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहेत. तसेच ते सुल्तानपूर लोकसभा मतदारसंघामध्ये आई मनेका गांधी यांच्या प्रचारावर लक्ष्य केंद्रित करतील, असेही सांगण्यात येत आहे.  

भाजपाने यावेळी पिलिभीत लोकसभा मतदारसंघातून वरुण गांधी यांना उमेदवारी न देता त्यांच्या जागी जितिन प्रसाद यांना संधी दिली आहे. मात्र वरुण गांधींच्या मातोश्री मनेका गांधी यांना भाजपाने सुल्तानपूर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा संधी दिली आहे. दरम्यान, वरुण गांधी यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केला होता. त्यामुळे ते बंडखोरी करून पिलिभीत येथून अपक्ष निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तवली जात होता. मात्र आता त्यांच्या टीमने वरुण गांधी हे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 

दरम्यान, भाजपाचे उत्तर प्रदेशमधील प्रदेशाध्यक्ष वरुण गांधी यांना उमेदवारी न देण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना सांगितले होते की, यावेळी पक्षाने त्यांना निवडणूक लढवण्याची संधी दिलेली नाही. मात्र ते आमच्यासोबत आहेत. त्यांच्याबाबत पक्ष नेतृत्वाने काही चांगला विचार केलेला असावा. दरम्यान, वरुण गांधी हे गांधी कुटुंबातील असल्याने त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याचा दावा काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केला होता. तसेच त्यांना काँग्रेसमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्यावर प्रतिक्रिया देताना भूपेंद्र सिंह म्हणाले की, वरुण गांधी हे भाजपाचे सच्चे शिपाई आहेत. तसेच ते भाजपामध्येच राहतील, याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. ते गांधी कुटुंबातील आहेत आणि भाजपानेच त्यांना तीन वेळा खासदार बनवलं आहे. 

वरुण गांधी हे २००४ मध्ये भाजपामध्ये दाखल झाले होते. त्यानंतर २००९ मध्ये पिलिभीत येथून लोकसभा निवडणूक लढवून ते लोकसभेत पोहोचले होते. त्यानंतर २०१४ मध्ये सुल्तानपूर आणि २०१९ मध्ये पुन्हा पिलिभीत येथून ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. दरम्यान, गतवर्षी राहुल गांधी यांनी एका मुलाखतीमध्ये वरुण गांधी यांच्याबाबत प्रतिक्रिया दिली होती. त्यात ते म्हणाले होते की, मी त्यांना भेटू शकतो, त्यांची गळाभेट घेऊ शकतो. मात्र ते ज्या विचारसरणीशी संबंधित आहेत तिला मी स्वीकारू शकत नाही. हे अशक्य आहे, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :Varun Gandhiवरूण गांधीBJPभाजपाpilibhit-pcपीलीभीतManeka Gandhiमनेका गांधीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४