शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

Rahul Gandhi : राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते होणार? काँग्रेस खासदाराने केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 13:19 IST

Rahul Gandhi : देशात एनडीएला पुन्हा एकदा बहुमत मिळाले आहे, एनडीएच्या सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू आहेत.

Rahul Gandhi ( Marathi News ) :  लोकसभेचे निकाल समोर आले असून एनडीएला पुन्हा एकदा बहुमत मिळाले आहे. एनडीए केंद्रात सरकार स्थापन करणार आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.  दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत चर्चा सुरू आहे. या पदासाठी राहुल गांधी यांचे नाव पुढे येत असल्याचे बोलले जात आहे.

राहुल गांधी यांनी सभागृहात काँग्रेसची धुरा सांभाळावी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते व्हावे, अशी मागणी काँग्रेसमधील खासदारांनी केली आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत याबाबत निर्णय होणार आहे. दरम्यान, काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनीही राहुल गांधींना विरोधी पक्षनेते बनवण्याची मागणी केली आहे.

नितीशकुमार यांच्या जदयूने अखेर काडी टाकलीच; अग्निवीर, UCC वर विचार व्हायला हवा, मूळ मागणीही रेटली

मणिकम टागोर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स'वर पोस्ट करत लिहिले की, “मी माझे नेते राहुल गांधी यांच्या नावावर मते मागितली आहेत. अशा परिस्थितीत राहुल गांधी हे लोकसभेतील काँग्रेसचे नेते असावेत, असे माझे मत आहे. मला आशा आहे की इतर काँग्रेस खासदारही माझ्यासारखाच विचार करतील. बघूया काँग्रेस संसदीय पक्ष काय निर्णय घेते. आम्ही लोकशाहीवादी पक्ष आहोत.

लोकसभेत विरोधी पक्षनेते होण्यासाठी १० टक्क्यांपेक्षा जास्त जागा असणे आवश्यक आहे. २०१४ मध्ये काँग्रेसने ४४ जागा जिंकल्या होत्या आणि २०१९ मध्ये ५२ जागा जिंकल्या होत्या, यावेळी पक्षाने ९९ जागा जिंकल्या आहेत. यावेळी राहुल गांधी विरोधी पक्षनेते होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने मोठा विजय मिळवला आहे. यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे बोलले जाते. आघाडीतील जागांच्या बाबतीतही काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे.

'एनडीए'मध्ये जदयूने केल्या मोठ्या मागण्या

देशात एनडीए सरकार स्थापन करणार आहे. नितीशकुमार यांनीही पाठिंबा दिला आहे. दरम्यान, आता जदयूने काही मागण्या केल्या आहेत. समान नागरी कायदा आणि अग्निवीरबाबत आपली आधीचीच भुमिका राहणार असल्याचे जदयूने स्पष्ट केले आहे. जदयूचे महासचिव आणि प्रवक्ता के सी त्यागी यांनी सांगितले की या मुद्द्यांवर सर्व राज्यांशी बोलण्याची आणि त्यांचे विचार समजून घेण्याची गरज असल्याचे तेव्हाही सांगितले होते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल