शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

'मोदी सरकारच्या काळात चीन एक इंचही घेऊ शकत नाही', अमित शाह यांचे मोठे वक्तव्य...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 17:52 IST

विरोधकांकडून सातत्याने चीनी घुसखोरीचा मुद्दा उपस्थित केला जातो.

Lok Sabha Election : गेल्या अनेक दशकांपासून भारत आणि चीनमध्ये सीमावाद सुरू आहे. या सीमावादामुळे अनेकदा दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. अशातच, केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून चीन मोठ्या प्रमाणावर भारतीय भूमीवर कब्जा करतोय, अशी टीका विरोधकांकडून सातत्याने केली जाते. पण, प्रत्येकवेळी सरकारकडून या आरोपाचे खंडन केले जाते. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याचा पुन्नरुच्चार केला. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मंगळवारी(दि.9) आसाममधील लखीमपूर येथे प्रचारसभा घेतली. यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून, चीन भारताची एक इंचही जमीन ताब्यात घेऊ शकला नाही. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 1962 मध्ये चिनी हल्ल्यावेळी आसाम आणि अरुणाचल प्रदेशला 'बाय-बाय' केले होते, हे जनता कधीही विसरू शकत नाही, असा दावा त्यांनी केला.

अमित शाह यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, तुमचा खासदार कोण असेल, कोणत्या पक्षाचे सरकार तुम्हाला हवंय आणि पुढचा पंतप्रधान कोणाला करायचे, हे तुम्हाला 19 एप्रिलला ठरवावे लागेल. तुमच्यासमोर दोन पर्याय आहेत, एका बाजूला राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली INDI आघाडी आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप आहे. 

यावेळी शाह यांनी राम मंदिराचाही मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील केंद्र सरकारने बांगलादेशची सीमा सुरक्षित करुन घुसखोरी थांबवली. आगामी काळात आसाम देशातील इतर राज्यांप्रमाणे विकसित राज्य बनेल. काँग्रेसने राम मंदिराचा मुद्दा वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवला, पण हा निर्णय पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात घेण्यात आला.

टॅग्स :Amit Shahअमित शाहlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४chinaचीनIndiaभारत